राजापूर : राजापूर येथील दांडा ब्रिज मागील एक वर्षापासून या पुलाचे काम सुरू आहे. हा ब्रिज पाडून सुमारे एक वर्ष इतका कालावधी लोटून गेला आहे हा ब्रिज दांडा व शिरसे अशा दोन गावांना जोडणारा आहे. या पुलाचे काम न झाल्यामुळे आजूबाजूच्या ग्रामस्थांना त्याचा नाहक त्रास होत असून व्यापारी विद्यार्थी यांना सुमारे 30 किमी जास्तीचे अंतर कापावे लागत आहे. यामध्ये वेळ आणि पैसे दोन्ही गोष्टी वाया जात आहेत.
ही बाब तेथील स्थानिक रहिवाशांनी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या लक्षात आणून दिली, राजेश सावंत यांनी तातडीने बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क करत या पुलाचे काम का रखडले आहे याबाबत विचारणा केली व याचे काम त्वरित सुरू करावे अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली. याबाबत आम्ही पाठपुरावा करू या पुलाचे काम लवकरात लवकर सुरू होईल असे आश्वासन जिल्हाध्यक्ष यांनी दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष यांच्यासह तेथील तालुका अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे इतर सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
राजापूर दांडा पुलाची भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केली पाहणी..
