वसई:- (प्रमोद तरळ) शिवजयंतीचे औचित्य साधून दिनांक १८ फेब्रुवारी २०२४ रोजी “शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य” तर्फे वसई किल्ला येथे स्वछता मोहीम”राबविण्यात आली होती.या मोहीमेत एकुण २० गडरक्षक उपस्थित होते.त्यात पाच वर्षीय लहान मुले सुद्धा सहभागी होती हे विशेष: या मोहिमेत ३० गोण्या भरून कचरा अन् दुर्दैवाने २ गोण्या दारूच्या बाटल्या अश्या एकूण ३२ गोण्या कचरा जमा करण्यात आला व त्या कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट पुरातत्व विभागाच्या सहकार्याने लावण्यात आली.या परिसराने मोकळा श्वास घेतला.खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांना हीच खरी मानवंदना असेल हेच उपस्थित प्रत्येक गडरक्षकांच्या चेहऱ्यावर जाणवत होते.शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठान तर्फे पालघर जिल्ह्यातील गडकिल्यावर संवर्धन मोहीम राबविण्यात येतात.शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठान मध्ये सामील होण्या साठी सम्पर्क
अनिकेत कुडतरकर 9960981962
मनोज मोरे 9561913808
शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठान तर्फे वसई किल्ला येथे स्वछता मोहीम संपन्न.
