रत्नागिरी : निवडणुकीच्या दरम्यान सोशल मीडिया वरती तसेच प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून अनेक चुकीचे संदर्भ देत मजकूर पसरविले जातात याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांची आज भेट घेतली व आपले म्हणणे मांडले. काल सायंकाळनंतर सोशल मिडीयावर मा. रविंद्रजी चव्हाण, पालकमंत्री सिंधुदूर्ग यांचेबाबत आक्षेपार्ह विधाने करत एक पोस्ट प्रसिद्ध झालेली आढळून आली आहे. ज्या पोस्टच्या चुकीच्या मजकुरामुळे भाजपा नेते व कार्यकर्ते यांच्यात तेढ निर्माण करणे, गैरसमज निर्माण करणे असे पोस्ट कर्त्याचे हेतु असल्याचे सिद्ध होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अश्या आक्षेपार्ह पोस्ट प्रसिद्ध करणे हा गुन्हा असून यामुळे वातावरण गढूळ करून भाजपा विरोधकांना त्याचा फायदा करून घेण्याचा दृष्ट उद्देश स्पष्ट दिसून येतो. अश्या प्रकारच्या वादग्रस्त पोस्ट लिहून पक्षीय नेते, कार्यकर्ते यांच्यात तेढ निर्माण करा करण्याचा उद्दिष्ट पोस्ट करणाऱ्याचा असावा. या बाबत योग्य तो तपास आणि खातरजमा करून या पोस्टकर्त्यावर तसेच लेखकावर त्वरीत योग्य ती कारवाई करावी अशी विनंती आहे. तसेच भारतीय जनता पार्टीच्या विरोधात वातावरण तयार करण्यासाठी काही प्रसार माध्यमांच्या माध्यमातून चुकीच्या बातम्या पसरविल्या जात आहेत. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असे म्हणतात... अशा शब्दात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून काहीतरी बोलले जात आहे असा भास निर्माण केला जात आहे. अशा पद्धतीच्या बातम्या पसरविल्या जात असून संबंधित व्यक्तींवर कारवाई व्हावी. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून असे काही बोलले जात असेल तर त्याचे नाव घेऊन बातमी करा अशा सूचना दिल्या जाव्यात व अशा पद्धतीच्या काल्पनिक बातम्या कोणी करू नये. अशी मागणी भाजपच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष अतुलजी काळसेकर, लोकसभा क्षेत्र प्रमुख प्रमोद जठार, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, लोकसभा सहप्रमुख बाळासाहेब माने, विनोद म्हस्के, सतेज नलावडे, सोनाली आंबेकर, प्राजक्ता रूमडे, योगेश मुळ्ये, संदीप नाचणकर, दादा दळी,
डॉ ऋषीकेश केळकर,निलेश आखाडे, मंदार खंडकर, राजेंद्र फाळके, अशोक मयेकर, सुशांत पाटकर, संकेत मयेकर,
सोशल मिडीयावर फिरत असलेल्या आक्षेपार्ह पोस्टच्या व व्हाट्सअप वरील बातम्यांच्या निर्मात्यावर उचित कार्यवाही करा भाजप पदाधिकाऱ्यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी.
