राजापूर – (प्रमोद तरळ) तालुक्यासह सध्या संपूर्ण कोकणात लागणाऱ्या वणव्यात अमूल्य वनसंपदे बरोबर गुरांचे गोठे, घरांचे नुकसान होत आहे. दरवर्षी एप्रिल,में महिना आला की जंगलात वणवे पसरतात पंचनामे केले जातात परंतु नुकसान भरपाई मिळत नाही. शासनाने कमीत कमी निकषाच्या आधारे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी आंगले गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री विलास राऊत यांनी केली आहे
वणवे लागण्याची निश्चित कारणे सांगता येत नसली तरी वणव्यात मात्र आंबा,काजू, नारळी पोफळीच्या बागा तसेच गोठे भस्मसात होत आहेत अनेक वर्षांपासून वणव्यात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान होत आहे. परंतु आजतागायत शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. वणव्याचा आपत्कालीन परिस्थितीमध्ये सामावेश नसल्याने केवळ कागदोपत्री पंचनामे केले जातात परंतु आपद्ग्रस्तांना नुकसान भरपाई मिळत नाही म्हणून वणवा या आपत्तीचा नैसर्गिक आपत्तीमध्ये सामावेश करावा व कमीत कमी निकषाच्या आधारे जळीत ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई कशी मिळेल यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी जातीनिहाय लक्ष घालून शासन दरबारी पाठपुरावा करावा अशी विनंती श्री राऊत यांनी केली आहे
वणवाग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची सामाजिक कार्यकर्ते विलास राऊत यांची मागणी….
