मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी येथे झालेल्या भिषण अपघाता दोन कामगाराचा जागीच मृत्यू..

रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावरील बावनदी येथे भिषण अपघाता झाला असून दोन कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे असे वृत्त समोर येत आहे. लोखंडी सळ्या घेऊन एक ट्रक रत्नागिरी हुन संगमेश्वर कडे जाताना हा अपघात झाला आहे. ट्रक मध्ये मोठ्या प्रमाणात लोखंडी सळ्या भरल्याने हा ट्रक पलटी झाला व आत बसलेले कामगार सळ्या अंगावर पडल्याने जागीच ठार झाले आहेत. ग्रामीण पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करीत आहेत.

Exit mobile version