समिर शिरवडकर-रत्नागिरी.
रत्नागिरी : (नाटे) : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर मधील साखरी नाटे,आणि रत्नागिरी हुन तैलयुक मासे वाहतूक सायंकाळी ६ ते पहाटे ६ पर्यत होत असते. नाटे विभागात अनेक मासे साठा आणि त्यावर होणारे प्रक्रिया करणारे मोठ्या कंपन्या आहेत तिकडून माल भरून ते गोवा,व अन्य ठिकाणी केरळ च्या गाड्या वाहतुक करत असतात. त्यामधून पोलिस ठाणे ते संपूर्ण नाटे जैतापूर परिसर खराब पाणी आणि त्यात ऑईल असून ते पाणी नेहमीच सायंकाळी ६ .०० ते पहाटे ६.०० पर्यत रस्त्यावर जाणून बुजून ते उतार भाग दिसला की पाण्याचा कॉक खोलून पाणी बिनदास्त पने सोडत असतात.त्यामुळे अनेक दुचाकी स्वार घसरून पडतात आणि त्याचे खूप मोठे नुकसान होतेच, पण हात पाय मोडून कायमचे अधू होत आहेत.
सदर, विषयीं वारंवार मत्स्यव्यवसाय विभाग,पोलीस ठाणे, समनधीत कंपनी ,ग्रामपंचायत याना वेळोवेळी तक्रार करून सुद्धा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. याउलट ते उद्धट उत्तरे देऊन गाडी अंगावर घालण्याच्या धमक्या देतात.त्यांना मराठी भाषा समजत नसलेने आपल्या भाषेंत ते बडबड करत असतात.जैतापूर उतार वर अनेक अपघात झाले आहेत.याबाबत मत्स्यव्यवसाय विभाग नाटे त्यांच्या साखरी नाटे सोसायटीला पत्र सुद्धा दिले आहे,परंतु आज तागायत कोणतीही कारवाई झाली नाहीं.
. या पत्रांवये आपल्याला विनंति आहे की,वरील विषयी या बाबत वाहतुक विभागाकडून कठोरात कठोर कारवाई करून, महाराष्ट्र बाहेरील गड्या वर कायदेशीर कारवाई करून आम्हा स्थानिकांना या दुर्गंधी पासून आणि अपघाताच्या मालिकेपासून वाचवावे, ही विनंती…अन्यथा आम्हाला आमच्या न्याय हक्कसाठी १ मे महाराष्ट्र दिनी सर्व स्थानिकांसोबत उपोषनाला बसावे लागेल.अश्या आशयाचे पत्र परिवहन आयुक्त आणि उपप्रादेशिक विभाग MH08 ला चार दिवसांपूर्वी दिली होती. त्यांवर उपप्रादेशिक विभाग MH08 अजित ताम्हणकर या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून एक साळुंखे ऑफिसर करुन दोन दिवसात १० वाहनावरती कारवाई केली आहे असे उपप्रादेशिक विभाग कडून सांगण्यात आले.
सागरी महामार्गावरील होणाऱ्या मासे वाहतुकी दरम्यान रस्त्यावर पाणी सोडणाऱ्या वाहनांवर केली कारवाई; परिवहन आयुक्त मुंबई आणि उपप्रादेशिक विभाग MH08 केली होती तक्रार.
