ग्रुप ग्रामपंचायत दळे छप्परविना; इमारत दुरुस्ती चा ठराव एक वर्ष आधीच.

समिर शिरवडकर-रत्नागिरी.

राजापूर- ( दळे) :- राजापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत दळे च्या इमारती वरील छप्पर दि.२४-०४-२५ ला कोसळले.दुर्दैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. इमारत दुरुस्ती बाबत एक वर्षे आधीच ठराव पास झाला आहे.परंतु इमारत दुरुस्ती बाबत ग्रामपंचायत मधील लोकप्रतिनिधी आणि ग्रामविकास अधिकारी दुर्लक्ष केल्याचे या ठिकाणी दिसून येते.ग्रुप ग्रामपंचायत असणाऱ्या नऊ सद्स्य असणाऱ्या आणि जवळजवळ तीन हजार लोकसंख्या असणाऱ्या ग्रुप ग्रामपंचायतिला एक वर्ष आधी ठराव देवूनही दुरुस्ती ला निधी का मिळत नाही की,पाठपुरावा केलाच नाही असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.त्यातच दि.२४ ला इमारती वरील छप्पर कोसळले अजूनही त्यावर कार्यवाही नाही.याच छप्पर कोसळेलेल्या इमारती मध्ये दि.२४ ला विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते,आणि दि.२५ सुद्धा सभेचे ( मासिक) आयोजन केले होते. दरम्यान वरील विषयी ग्रामविकास अधिकारी गोरक्ष शेलार यांचशी दूरध्वनी वरुन संपर्क केला असता,ते असे म्हणाले की,याबाबत मी काही महिन्यांपूर्वी गटविकास अधिकारी यांना पत्र दिले आहे ते असे,की इमारत दुरुस्तीसाठी निधि मिळावा,जर इमारत कोसळली किव्हा अन्य काही नुकसान झालं तर मी जबाबदार नाही अश्या आशयाचे पत्र दिले आहे.तर आम्ही आता लगेचच तात्पुरती दुरुस्ती करू असे गटविकास अधिकारी जगताप यांचा दैनिक चालु वार्ता शी बोलतांना सांगितले.          दखल न्यूज महाराष्ट्र

Exit mobile version