केंद्र सरकारच्या पीएमश्री योजना महाराष्ट्रात लागू करण्यात येणार..

मुंबई : मंत्रीमंडळ बैठकीतील मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाने महाराष्ट्रातील शाळांचं पूर्ण स्वरूपच बदलणार आहे. केंद्र सरकारच्या पीएमश्री योजना महाराष्ट्रात लागू करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री स्कूल फॉर रायजिंग इंडिया महाराष्ट्रात राबवण्यासंदर्भात मंत्री मंडळ बैठकीत चर्चा झाली. योजनेच्या अंमलबजावणीसाठी मंत्र्यांमध्ये खलबते सुरू होती. केंद्र सरकारने सप्टेंबर 2022 रोजी योजनेची घोषणा केली आहे. या अंतर्गत देशात 14 हजार 597 शाळा सुरू करण्यात येणार आहे.
            या शाळा आदर्श शाळा म्हणून ओळखल्या जातील. देशातील 18 लाख विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
                  काय आहे पीएमश्री योजना? – या शाळेत नवीन तंत्रज्ञान, स्मार्ट क्लास, खेळ आणि आधुनिक पायाभूत सुविधा यावर विशेष लक्ष देण्यात येईल. – शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणे, राज्यातील साक्षरतेचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी ही उपायोजना सुचवल्या जातील, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या शाळांच्या माध्यमातून अंमलात आणले जाईल., केंद्र सरकारच्या या पथदर्शी प्रकल्पाची अंमलबजावणी राज्यात करण्याचा प्रयत्न आहे. वास्तविक जीवनाशी निगडित प्रात्यक्षिक शिक्षण देण्याचा प्रयत्न या योजनेत आहे. स्मार्ट क्लास, ग्रंथालय, कौशल्य प्रयोग शाळा, खेळाचे मैदान, विज्ञान प्रयोगशाळा अशा आधुनिक सोयी व सुविधा असतील. एकंदरीत महाराष्ट्रामध्ये शासकीय शाळांची परिस्थिती वाईट आहे आणि असाच मानस जनमानसामध्ये आहे ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि शासकीय शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी पीएम श्री ही योजना निश्चितच लाभदायक ठरणार आहे.
दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात.
Exit mobile version