पाचल गावच्या ग्रामपंचायतीला अजितजी यशवंतराव यांची भेट..

विकास व विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा…

राजापूर – (प्रमोद तरळ) तालुक्यातील पाचल हे एक महत्वपूर्ण व सर्व सुखसोयीयुक्त बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे या गावच्या ग्रामपंचायतीला मंगळवार दि. ९ मे २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस व रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री अजित यशवंतराव यांनी भेट दिली ‌‌
‌ यावेळी पाचल गावचा विकास व इतर महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली गेली अनेक वर्षे राजापूर तालुक्यातील पूर्व भागाला तालुक्याचा दर्जा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे पाचल असेल किंवा रायपाटण राजापूर तालुक्यातील या भागाला स्वतंत्र तालुका मिळायला हवा या मागणीसाठी आपण शासनदरबारी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले गावच्या सदस्य, सरपंच व उपसरपंच यांच्या विनंतीला मान देऊन या नवीन नवनिर्वाचित कमिटीचा सन्मान स्विकारण्याचे आज मला भाग्य लाभले याबद्दल मी आपला कायम ऋणी राहीन कारण पाचल आणि माझे नाते हे पारिवारिक असून पाचल गावच्या विकासासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे मला कधीही हक्काने,
अधिकाराने हाक मारा कधीही धावत येईन आपल्या सेवेसाठी मी सदैव तत्पर असेन असे आश्वासन श्री यशवंतराव यांनी यावेळी दिले. दखल न्यूज महाराष्ट्र

Exit mobile version