श्री काळभैरवनाथ फाउंडेशन पुणे संस्थेच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर संपन्न..

पुणे‌ – (प्रमोद तरळ) “रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” रक्तदान हे जीवनदान हा विचार ठेवून पुण्यातील रक्तपेढी मधील रक्ताचा साठा कमी असून हीच गरज लक्षात घेऊन दिवंगत स्वर्गीय अनुसया गोविंद भोसले व स्वर्गीय कॅप्टन रामचंद्र काशीराम उत्तेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री काळभैरवनाथ फाउंडेशन पुणे या संस्थेच्या भव्य रक्तदान शिबिर १८ जून २०२३ सकाळी ९ ते ३ हॉटेल समृद्धी, विश्रांतवाडी,पुणे या ठिकाणी उत्तम पद्धतीने पार पडले. त्यावेळेस कोकणातील समाजातील २५ संघटनांनी सहभागी होऊन ९२ रक्तदात्यांनी रक्तदान करून भरघोस प्रतिसाद दिला तसेच इतर महिलांनी सहभागी होऊन रक्तदान केले.
त्यावेळेस रक्तदात्यांना ग्लुकोज,‌ चहा,नाश्ता देण्यात आला सर्व रक्तदात्यांना फाउंडेशनचे अध्यक्ष अजित कदम यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.सुरुवातीला आपल्या भाषणातून फाउंडेशनचे प्रेरणास्थान किसनराव भोसले यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगून जगात मानवी रक्त हे कृत्रिमरित्या तयार करता येत नाही त्यामुळे रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे. सर्वांनी रक्तदान करून गरजू लोकांना जीवनदान देऊन जीवनातील महत्त्वाचे कार्य पार पाडावे.त्यानंतर शेवंताई महिला बचत गटाचे अध्यक्षा शिल्पाताई साळुंखे यांनी सर्वांचे स्वागत करून रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले.याप्रसंगी पंधरा गाव विकास मंडळ पुणे अध्यक्ष संजय उत्तेकर म्हणाले महाराष्ट्रातील बऱ्याचशा संस्था फाउंडेशनच्या समाजसेवेचा आदर्श घेत असतात ही मोठी कौतुकाची गोष्ट आहे.सुजय प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश सकपाळ मैत्री रक्ताची म्हणाले रक्तदान करणे किती गरजेचे व का करावे हे पटवून दिले.फाउंडेशनचे आधारस्तंभ अरविंद चव्हाण म्हणाले की जगातक्ष आईच्या दुधाला जेवढे महत्त्व असते त्यापेक्षाही जास्त महत्व रक्तदानाला असते. फाउंडेशनचे आधारस्तंभ व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संतोष मेढेकर यांनी फाउंडेशनची शिस्त व रक्तदान शिबिराचे कौतुक केले.
फाउंडेशनचे आधारस्तंभ व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुनील मोरे म्हणाले की कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा न घेता रक्तदान शिबिर व इतर सामाजिक कामे राबविणे तेही निस्वार्थपणे हे फक्त श्री काळभैरवनाथ फाउंडेशनच करू शकते.
फाउंडेशनचे आधारस्तंभ व कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील कदम (अभियंता-मनपा, पुणे) मनोगतात म्हणाले देशांमध्ये संपत्ती दानशूर खूप आहेत परंतु देशाला,राज्याला गरज आहे ती रक्तदात्यांची.
रक्तदान शिबिरास अनेक मान्यवरांनी व संघटनांनी उपस्थिती दाखवली यापैकी विठोबा महाडिक,मधुकर महाडिक,राजू कदम,बाळा विश्वासराव,अनिल सावंत,वसंत आमकर,सुनिता उत्तेकर,संजेश उत्तेकर,दिपालीताई गायकवाड, सुनील पवार,दीपक येरापले, राकेश सावंत गणेश जाधव रामदास सुर्वे,रवींद्र कदम,जावेद शेख,तुषार खांबे,कृष्णा कदम तसेच रक्तदानासाठी विशेष परिश्रम घेतले संस्थापक विकास शिंदे,अजय कदम,जयराज मोरे, नितीन निकम,राजेश पवार, अंकुश घोलप,रवींद्र सुर्वे,कृष्णा कदम,संतोष सावंत इत्यादी मान्यवर उपस्थित होते.शिबिराचे सूत्रसंचालन फाउंडेशनचे सेक्रेटरी जयराज मोरे (अभिनेता,गायक, निवेदक) यांनी आपल्या बहारदार शैलीत केले.आभार फाउंडेशनचे सल्लागार अंकुश घोलप यांनी मानले. दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात
Exit mobile version