मुंबई : देशभरामध्ये फाईव्ह जी नेटवर्क सेवा काही महत्त्वाच्या शहरांमध्ये सुरू झाली असून सर्वांनाच ‘५जी’ सेवेची आतुरता लागून राहिली आहे. याचाच फायदा घेत सायबर गुन्ह्यांची संख्या देखील वाढत आहे .अनेकांना फोन करून एसएमएस द्वारे किंवा ई-मेल द्वारे संदेश पाठवून ५जी सेवा चालू करण्याचे आमीश दाखवून जाळे पसरले जात आहे. दिल्ली आणि झारखंड या राज्यातील सायबर गुन्ह्यांवर हे रॅकेट चालत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

▶️ भारतीय जनता पार्टी पुरस्कृत यंग बॉईज ग्रुप आयोजित श्री दुर्गामाता चषक जिल्हास्तरीय नाईट हॉलीबॉल स्पर्धा परटवणे खालचा फगरवठार.
▶️ दखल न्यूज महाराष्ट्र.
‘५ जी’ ही सेवा भारतातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये सुरू झाली असून अन्य काही शहरांमध्ये टप्प्याटप्प्याने ती सुरू केली जाणार आहे. मात्र सामान्य माणसाच्या मनात याबाबत कमालीची उत्सुकता आहे. याचा गैरफायदा सायबर गुन्हेगारांकडून घेतला जात असून टेलिकॉम कंपनीच्या नावाने फोन करणे एसएमएस करणे सुरू आहे. सिम कार्ड अपडेट करून देण्याच्या नावावर हे सर्व सुरू असल्याचे निदर्शनास येत असून फसवणूक केल्याच्या घटनाही समोर येत आहेत.
आपणास ‘५जी’ सेवेसाठी सिम कार्ड अपडेट करून देतो असा कोणाचाही फोन अथवा संदेश आल्यास त्यास प्रतिसाद देऊ नये. कोणीही आपल्या बँक खात्याची माहिती एटीएम कार्डची माहिती अथवा अन्य कोणतीही खाजगी माहिती देऊ नये त्या मोबाईल क्रमांकाला ब्लॅकलिस्टमध्ये टाकावे अशी लिंक, एसएमएस अथवा ई-मेल द्वारे आल्यास ती उघडू नये आणि कोणाला शेअरही करू नये आणि आपणास कोणत्याही प्रकारचा आलेला OTP इतरांना सांगू नये. अन्यथा आपल्या बँक खात्यातून पैसे परस्पर काढले जाऊ शकतात आणि आपली फसवणूक होऊ शकते. सतर्क राहूया आणि सायबर गुन्ह्यांना आळा घालूया.
दखल न्यूज महाराष्ट्र.