बातम्या

महाराष्ट्रातील तरुणांनो, जरा इकडे लक्ष द्या! – भाजपा सोशल मीडिया संयोजक योगेश मुळे आदित्य ठाकरे शास्त्रशुद्ध अपप्रचार करून सर्वसामान्यांची दिशाभूल करीत आहेत.

संगमेश्वर: हातची सत्ता गेल्याने आदित्य ठाकरे सध्या बेभान झाले आहेत. त्यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळातील कामकाजाचे दुष्परिणाम शिंदे-फडणवीस सरकारवर पडताना दिसत आहेत. प्रशासकीय पुराव्यांनिशी आता हे सिद्ध झाले आहे की वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प, बल्क ड्रग पार्क प्रकल्प आणि नुकताच गेलेला टाटा एयरबस प्रकल्प हे ठाकरे सरकारने टक्केवारीसाठी अडवणूक केल्यानेच महाराष्ट्राबाहेर गेले आहेत. 'जाईन तिकडे टीकाच करेन' हा 'एककलमी टीकाकरण' अजेंडा राबवणाऱ्या आदित्यजींनी मा. देवेंद्रजींना आवाहन देण्याची चेष्टा करण्यापेक्षा माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. या चार महिन्यांच्या कार्यकाळात मा. मुख्यमंत्री शिंदेजी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात ९ प्रकल्प आले. आणि कालच मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी महाराष्ट्रातील पुण्यामध्ये दोन प्रकल्प उभारण्यासाठी आश्वासन दिले आहे. आदित्यजी आपण आपल्या कार्यकाळात महाराष्ट्रात आणलेल्या प्रकल्पांची यादी केव्हा जाहीर करताय? रायगड येथे अंदाजे २० हजार कोटी रूपये इतकी गुंतवणूक करून होणारा सिनारामस् पल्प अँड पेपर प्रकल्प, ७५८ कोटी रुपयांचा मेगा पाईप्स प्रायव्हेट लिमिटेड प्रकल्प,

नागपूर येथे सुमारे ३७८ कोटी रूपये इतकी गुंतवणूक करणारा सोलार इंड्रस्ट्रिज इंडिया प्रकल्प, महाराष्ट्र सिमलेस लिमिटेड प्रकल्प रायगड जिल्ह्यात ३७५ कोटी रुपयांची गुंतवणूक घेऊन येत आहे. अहमदनगरमध्ये ६६२ कोटी रूपये गुंतवणूक करणारा सनफ्रेश ऍग्रो इंडस्ट्रीज प्रकल्प, ७७९ कोटी रूपये गुंतवणूकीचा वरूण बेवरजेस लिमिटेड प्रकल्प, १२६ कोटी रुपये गुंतवणूकीचा सोलापूरस्थित विठ्ठल कॉर्पोरेशन प्रा. लिमिटेड प्रकल्प, पुण्यात ४०० कोटी रूपये गुंतवून होणारा आयएफबी रेफ्रिजरेटर्स लिमिटेड प्रकल्प, जळगाव येथे होणारा जेनक्रेस्ट बायो प्रोडक्ट्स प्रकल्प ज्याची किंमत ६५० कोटी रुपये आहे. एवढे प्रकल्प ४ महिन्यात महाराष्ट्र सरकारने प्रयत्नपूर्वक राज्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आणले आहेत. याशिवाय कालच केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे १६०० कोटी रूपयांची गुंतवणूक असणारे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर आणि सीडॅक या दोन कंपन्या आपले प्रकल्प पुण्यामध्ये सुरू करणार आहेत. तर आदित्यजी अशी यादी ज्या दिवशी आपणास जमेल त्या दिवशी महाराष्ट्राच्या सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांना आवाहन द्या. आणि हो, हे सरकार काम करणारे आहे. तुमच्यासारख्या विरोधकांच्या प्रश्नांना सर्वांनीच उत्तर देऊन फुकट घालवायला त्यांच्याकडे फार कमी वेळ आहे. त्यामुळे यांनीच उत्तर दिलं पाहिजे, त्यांनीच का दिले असले बालिश हट्ट कृपया धरू नका. अपेक्षाभंगाचे दुःख पचवणे फार कठीण असते त्यामुळे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा प्रेमाचा सल्ला. वरळी विधानसभा मतदारसंघातील जनता आपल्या नेतृत्त्वाखाली विकासाची गंगा कधी येतेय याची वाट पहात आहे.

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!