आज महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना घडली आहे. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड करून शिवसेनेमध्ये दोन गट तयार झाले होते. शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट असे हे दोन गट तयार झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट शिवसेना या नावावर आणि चिन्हावर हक्क दाखवला होता. त्यानंतर हे प्रकरण निवडणुक आयोगाकडे गेले होत. निवडणूक आयोगाच्या न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी पूर्ण झाली होती. तर आयोगाने निकाल हा राखून ठेवला होता. तर आज निवडणूक आयोगाने निकाल जाहीर करत शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला देण्यात आले आहे.
पक्षचिन्हाबाबतचा निर्णय देताना निवडणूक आयोगाने म्हंटले की शिवसेनेची आत्ताची घटना ही लोकशाही विरोधी आहे. पक्षसंघटनेत कंपूगिरी करुन लोकांच्या नियुक्त्या केल्या जातात. नियुक्त्यांसाठी कोणत्याही निवडणूका घेतल्या जात नाहीत. अशा प्रकारची रचना असलेल्या पक्षात इतरांना विश्वास मिळू शकत नाही, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
राजकीय पक्षांची पदाधिकाऱ्यांच्या निवडणूकांना पारदर्शी पद्धतीने वाव देणारी असली पाहिजे आणि पक्षांतर्गत वादांची मोकळ्या पद्धतीने सोडवणूक झाली पाहिजे. घटनेतील अशा तरतुदी सहजासहजी बदल करता येऊ नयेत आणि जर असा बदल करायचा असेल तर पक्षसंघटनेतून मोठा पाठींबा असणे आवश्यक आहे.
दखल न्यूज महाराष्ट्र.

