बातम्या

भारतीय क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांच्या त्या जयगड मधील अनधिकृत बांधकामाला दंड.

अनधिकृत गौणखनिजबाबात बारा लाख पासष्ट हजार दंड,तर अनधिकृत बांधकामाबाबत महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४४,४५ नुसार कारवाई

सामीर शिरवडकर-रत्नागिरी.

रत्नागिरी:- ( जयगड) :- रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड मधील ग्रामपंचायत रीळ येथील समुद्र किनारी केलेले बांधकाम आत्ता वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे.माहिती अधिकार महासंघ महाराष्ट्र राज्याचे सचिव सन्मा.समीर शिरवडकर यांनी काही दिवसांपूर्वी रत्नागिरी तहसील कार्यलयाला संमधीत बांधकामा बाबत पत्राद्वारे विचारणा केली होती. सदर बांधकाम हे समुद्र किनारी असून, संपूर्ण बांधकाम अनधिकृत असून,वाळूचा भराव करून, आजूबाजूला असलेले कांदळवनाची तोड करून केले आहे.मुळात जागा ही महाराष्ट्र सागरी मंडळ याची असूनही कोणताहि विभागाची परवानगी घेतलेली दिसून येत नाही.त्यासाठी मा. तहसीलदार रत्नागिरी यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता.अश्या अशयाची बातमी दैनिक चालु वार्ता ने काही दिवसांपूर्वी केली होती,त्याचा सतत पाठपुरावा सुरू होताच, अनेक अडचणींना तोंड देत,कारण व्यक्ती महान,आणि राजकिय पुढाऱ्यांचा निकटवर्तीय असलेने तपास संथ गतीने सुरू होता.
मंडळ अधिकारी यांच्या अहवालानुसार ग्रामपंचायत रीळ मधील हे बांधकाम गट क्र.६४४ क्षेत्र ०.०४.३० या मिळकत समुद्रच्या बाजूला असून,सदर चे बांधकाम करतांना आजूबाजूची खारफुटी कांदळवन तोडून समुद्राच्या हद्दीत अतिक्रमण केले आहे.सदर बांधकाम ७/१२ नुसार ४३० चौ. मी.आहे,परंतु त्यांनी केलेले बांधकाम हे ४३.७० मी.लांब व १५.६० रुंद असे एकूण ६८१.७२ चौ.मी.आहे.सदर बांधकाम हे ७/१२ पेक्षा जास्त आहे.त्यामुळे वाढीव समुद्राच्या हद्दीत केले आहे हे सिद्ध होते.परंतु गटबुक नकाशा नसल्याने किती अनधिकृत वाढीव बांधकाम केले आहे याची मोजणी करता येत नाही.त्याचप्रमाणे सदर बांधकाम हे चि ऱ्या चे असलेने त्याच्या आत २० ते ३० ब्रास वाळूचा भरणा केला आहे.याची सुद्धा परवानगी नसलेचे दिसून येते.असे स्पष्ट केले आहे.या अहवालानुसार पुन्हा एकदा तालाठी सजा चाफेरी यांचा दि.३१ जुलै २४ च्या अहवालानुसार अनधिकृत बांधकामाबाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४४ व ४५ अनव्ये ,तर अनधिकृत कांदळवन तोड विषयी मा. उपविभागीय अधिकारी यांच्याकडे कारवाई साठी दिले असून,अनधिकृत गौणखनिजाबाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८(७) अनव्ये दंडात्मक कारवाई पात्र असून अनधिकृत वाळूच्या उत्खनना बाबत दंड प्रति ब्रास रु.१००००/-प्रमाणे २५ ब्रास चा २,५०,०००/-च्या चार पट दंड रू.१२,५०,०००/-व रॉयल्टी रक्कम प्रति ब्रास ६००/-प्रणाने रु.१५०००/- असे एकूण रु.१२,६५०००/- का करू नये याबाबत खुलासा सात दिवसात या कार्यलयाकडे लेखी स्वरूपात सादर करावा, अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी नोटिस जयगड अनधिकृत बांधकाम चे मालक भारतीय क्रिकेटपटू श्री. प्रवीण कल्याण आमरे यांना जा. क्र.१/अ. गौ/अ. बा./१७७०,१६/१२/२४ दि.०२/०८/२४ रोजी म.तहसीलदार श्री. राजाराम म्हात्रे यांनी दिली आहे.
परंतु,केलेल्या अनधिकृत वाढीव बांधकाम बाबत, अनधिकृत वाळु उपसा,आणि कांदळवन तोड बाबत समनधितावर कोणती कारवाई करणार याकडे समस्त महाराष्टाच लक्ष लागले आहे.

जाहिरात

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!