मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा विजयी..
प्रतिनिधी : हर्ष नागवेकर
रत्नागिरी:- दि.०३ डिसेंबर
भारतीय जनता पार्टी रत्नागिरीच्या वतीने भाजपने मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजय संपादन केल्याबद्दल भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय आठवडा बाजार व मारुती मंदिर येथे ढोल ताशांच्या गजरात ठेका धरीत, पेढे-लाडू वाटून,फटाके फोडुन व गुलाल उधळीत आनंदोत्सव व जल्लोष साजरा करण्यात आला.
जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांच्या व विधानसभा क्षेत्रप्रमुख माजी आमदार बाळासाहेब माने यांच्या नेतृत्वाखाली सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष यांच्या उपस्थितीत सर्व भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात मोठा उत्साह पाहायला मिळाला.
भारतीय जनता पार्टीने मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या राज्यात मिळवलेले यश म्हणजे लोकसभेची सेमी फायनल भाजपाने जिंकल्यासारखे आहे. भाजपाचे सर्व कार्यकर्ते लोकसभेसाठी तयार झाले असून हर घर संपर्क च्या माध्यमातून लोकांचे समर्थन मिळवत आहे आणि भारतीय जनता पार्टी मोठ्या संख्येने लोकसभेत देखील विजयी होईल असा विश्वास माजी आमदार बाळासाहेब माने यांनी बोलताना व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टीला मिळालेले यश हे सर्व भाजपा कार्यकर्त्यांच्या मनात उत्साह निर्माण करणारे आहे. मध्यप्रदेश मध्ये भाजप सरकारने आणि मोदी सरकारने दिलेल्या योजना या सर्वांचा लाभ तेथील नागरिकांना झाला आणि म्हणूनच या सर्व राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला दैदित्यमान असे यश मिळाले आहे. ही यशाची घोडदौड अशीच यापुढे चालू राहणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असलेला विश्वास सार्थ ठरला आहे असे मत जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांनी बोलताना व्यक्त केला.
दखल न्यूज महाराष्ट्र.
