बातम्या

भाजपच्या सिंदूर रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद; भारत माता की जय च्या घोषणा..

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने रत्नागिरी दक्षिण शहर येथे भव्य सिंदूर रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीचे आयोजन महिला मोर्चा शहराध्यक्ष सौ. पल्लवी पाटील यांनी केले होते.
           या रॅलीला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रॅलीदरम्यान भगव्या पताका, पारंपरिक वेशभूषा आणि सिंदूर लावलेली शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. रॅलीतून महिला शक्तीचा जागर करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले असून, रत्नागिरी शहरात  महिला मोर्चा सशक्तपणे कार्यरत असल्याचे या रॅलीतून दिसून आले. शहर अध्यक्ष पल्लवी पाटील यांनी यासाठी मेहनत घेतली. भारत माता की जय, वंदे मातरम घोषणाने सारा परिसर दुमदुमला.

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!