चिपळूण : (ओंकार रेळेकर) कोकण सह संपूर्ण महाराष्ट्रात नावलोंउकिक मिळविलेल्या आम्ही सावित्रीच्या लेकी संस्थेचे चिंतन शिबिर नुकतेच बोरीओळी येथे उत्साहात संपन्न झाले . या शिबिरात संस्थेच्या सर्व सभासद आणि हितचिंतक यांनी सहभाग नोंदविला. चिंतन शिबिरात सर्व उपस्थित मंडळींना संस्थेची धैर्य धोरणे स्पष्ट करून कामकाजाचे महत्त्व पटूउन देण्यात आले यावेळी श्री.रमेश नागावकर (डेप्युटी चीफ इन्स्पेक्टर,मुंबई) हे होते. त्यांनी सर्व प्रोजेक्टच्या कामाची प्रशंसा केली.
विशेष अतिथी आणि मार्गदर्शक म्हणून अहिल्याबाई होळकर सामाजिक संस्थेचे सर्वेसर्वा संदीप नाचन होते.त्यांनी संस्था आणि संस्थेचे कामकाज वाढवण्यासाठी सखोल मार्गदर्शन केले .संस्थापिका सौ.सरिता खेडेकर यांनी येणाऱ्या पिढी वर कोणते संस्कार केले पाहिजे याची माहिती दिली.अध्यक्षा सौ .अंकिता चिंचघरकर आणि उपाध्यक्षा सौ. दिप्शा बोरले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सौ.शुभदा गोरुले,सौ.सोनल आग्रे,सौ.अर्चना लष्कर,सौ.उषा वाईकर,सौ.शारदा विश्वकर्मा आणि श्री.विनायक महाडिक, श्री.दत्ता केलस्कर,श्री.सचिन गावडे यांनी सभेचे नियोजन करून शोभा वाढवली.सचिव श्री. सुनिल भ.भोसले.यांनी प्राथने पासुन मीटिंग ची चांगली सुरुवात करून पाहुणे आणि उपस्थित नवीन ट्रस्टी या सर्वांचे आभार आणि पसायदान घेवून मीटिंगची सांगता केली. दखल न्यूज महाराष्ट्र.

