रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील घेरापालगड किल्लेमाची गावातील कदम भावकीची कुलस्वामीनी भैरी भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ रविवार दिनांक १८ मे २०२५ दिवशी अतिशय भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.धार्मिक रूढी परंपरेनुसार गोंधळ झाला.दिवटी पेटवून पारंपरिक गाणे गात कार्यक्रम संपन्न झाला.अनेक महिला वर्ग आणि ग्रामस्थ उपस्थित होते.तसेच या गोंधळासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच राखण देऊन शाकाहारी आणि मांसाहारी जेवण देण्यात आले. ही अशीच रूढी,परंपरा पुढे युवा पिढीने पण जपली पाहिजे.
- Home
- कदम भावकीची कुलस्वामीनी भैरी भवानी देवीचा गोंधळ कार्यक्रम संपन्न