रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर मंडल शहराध्यक्ष श्री.परशुराम(दादा)ढेकणे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये चांगला प्रतिसाद मिळून ५० पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ व शहरातील शाळांमधील 10 वी. बोर्ड परीक्षेत गुणवंत विद्यार्थी तसेच शहरातील सर्व ज्युनियर कॉलेज मधील 12वी. बोर्ड परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा जिल्हाध्यक्ष श्री.राजेशजी सावंत व कोकण पदवीधर विधान परिषद आमदार श्री. निरंजनजी डावखरे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ.वर्षाताई ढेकणे, पदवीधर आघाडी संयोजक श्री. मनोज पाटणकर साहेब.भटके विमुक्त आघाडीचे जिल्हा संयोजक निलेश आखाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
निबंध स्पर्धेसाठी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आणि कार्यावर आधारित विषय देण्यात आले होते. अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यावर लिहिण्यात आलेले निबंध अतिशय सुंदर अभ्यास व वाचन करून लिहीण्यात आले होते. यामध्ये प्रथम क्रमांक राजसा राजेंद्र कदम , द्वितीय क्रमांक तीर्थ दीपक मयेकर, तृतीय क्रमांक सौ. वैशाली भास्कर झोरे. यांना आकर्षक सन्मान चिन्ह, रोख रक्कम, व प्रमाणपत्र देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरवण्यात आले. तसेच 10वी/12वी परीक्षांमध्ये रत्नागिरी शहरातील शाळा व महाविद्यालयांमध्ये क्रमांक मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला शेकडो विद्यार्थी व पालक या सत्कार सोहळ्याला उपस्थित होते. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व निवेदन भ.वी.आ. जिल्हा संयोजक निलेश आखाडे यांनी केले.
या कार्यक्रमास शिर्के प्रशालेचे शिक्षक श्री.राजेश आयरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना अहिल्यादेवी होळकर यांच्या बद्दल माहिती आणि पुढील शैक्षणिक वाटचाल विषयी मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांनी बोलताना या उपक्रमांचे कौतुक करत अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श आपण नक्कीच घेतला पाहिजे असे सांगितले. पदवीधर आमदार निरंजन डावखरे यांनी मार्गदर्शन करताना अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले राजकीय धार्मिक सामाजिक कामाचा दाखला देत आजपर्यंत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती इतक्या मोठ्या प्रमाणात कोणी का साजरी केली नाही. त्याचं काम देशभर जाणे आवश्यक आहे त्यासाठीच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशभर हे कार्यक्रम केले जात आहे असे सांगत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला महिला शहराध्यक्ष सौ.पल्लवीताई पाटील, सौ. संगीताताई कवितके, सौ. सायलीताई बेर्डे, श्री.संदीप(बाबू)सुर्वे, श्री. नितीन जाधव, श्री.सचिन गांधी, श्री.मंदार खंडकर, श्री.शैलेश बेर्डे.आदी उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र
