बीड : भारतातील व भारताबाहेरील इतर काही देशातील बंजरा समाजाचे श्रद्धास्थान असणारे थोरसमाजसुधारक राष्ट्रसंत सतगुरु क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज यांची १५ फेब्रुवारी रोजी २८४वी जयंती प्रत्येक तांड्या-तांड्यात उत्साहात साजरी करावी असे आवाहन मा.आकाश भाऊ जाधव 07 फाऊंडेशन चे पै.शैलेश शंकरराव जाधव यांनी केले आहे. या संदर्भात प्रसिद्धीस पत्रकात असे म्हटले आहे की शूरवीर लढवय्या गोर बंजारा समाजाच्या हितासाठी आणि अस्तित्वासाठी क्रांतिकारी सतगुरु सेवालाल महाराज यांनी आयुष्यभर प्रयत्न केले समाजातील अंधश्रद्धा बाहेर काढली समाजाने वास्तववादी विज्ञानाची कास धरावी यासाठी विशेष प्रयत्न केले होते
थोर समाजसुधारक आणि राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या मुळ विचारधारा सोडुन बंजारा समाज हा सनातनी संस्कृतीकडे घेऊन जाण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न या देशातील मनुवाधांनी सुरू केले आहे त्यामुळे समाजातील सुशिक्षीत बुध्दीजीवी घटकांनी आता विचार करण्याची वेळ आली आहे १५ फेब्रुवारी रोजी सतगुरु सेवालाल महाराज यांची २८४ वी जयंती असून राज्यातील तमाम समाज बांधवाने प्रत्येक तांड्या-तांड्यात जयंती साजरी करावी आणि आपला स्वाभिमान जिंवत ठेवावा व जयंती समाजउपयोगी कामे करून उत्साहात साजरी करा असे आवाहन एस एस जाधव यांनी केले आहे. दखल न्यूज महाराष्ट्र.