रत्नागिरी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग प्रदेश अध्यक्ष मा. भानुदास माळी यांच्या सुचने नुसार ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष दीपक राऊत यांच्या मार्गदर्शनखाली काही पुढील प्रमाणे मांगणी करण्याचे निवेदन देण्यात आले.त्यामधील प्रमुख मागण्या मध्ये जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र राज्य मध्ये लागू करण्यात यावी, बिहार राज्य प्रमाणे ओबिसिची जात निहाय जनगणना महाराष्ट्र राज्य मध्ये करण्यात यावी.ओबीसी, मागासवर्गीय तसेच अल्पसंख्यांक समाजाशी सलग्न विविध महामंडळाची कर्ज माफ करून शासन दरबारी आणि कोर्टात असलेल्या केसेस त्वरित मागे घ्याव्यात. महात्मा फुले,सावित्रीबाई फुले आणि अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा.निवडणुका मध्ये इव्हीम चा वापर बंद करण्यात यावा , महविकास आघाडीच्या काळात जिल्ह्यात ठिकाणी ओबीसी विद्यार्थ्यांना वस्तीगृह सुरू करण्याच्या निर्णयाचा त्वरित अमल बजावणी करण्यात यावी अश्या मांगण्याचे निवेदन ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष वासुदेव सुतार यांनी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्याकडे देण्यात आले त्यावेळेस मिडिया विभाग जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर,विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन मालवणकर, गजानन दळी, भगवान सुतार, रमेश पांचाळ,संतोष माचकर,संजय नांदगावकर,राजेंद्र माचकर, शंकर निवळकर, शैलेश शिळकर,आरती निवलकर , संजय माचकर इत्यादी जिल्ह्यातून कार्यकर्ते सहभागी झाले होते. दखल न्यूज महाराष्ट्र.
