बातम्या

डहाणू लोकलचा १० वा वाढदिवस उत्साहात साजरा. . ‌‌.

यावेळी वैतरणा ते डहाणू या ८ ही स्थानकातील गैरसोयीबद्दल हजारो प्रवाशांनी निवेदने सादर केली

विरार – (प्रमोद तरळ) विरार पासून डहाणू लोकल धावली तो दिवस म्हणजे १६ एप्रिल २०१३.
या दिवशी १० वाजून १० मिनिटांनी डहाणू रोड येथून चर्चगेट पर्यंत पहिली लोकल सुरू करण्यात आली होती . त्यामुळे अनेक वर्ष संघर्ष करून लोकलच्या अपेक्षेत असणाऱ्या प्रवाशांनी आनंद व्यक्त करत तो दिवस जल्लोषात साजरा केला. शिवाय वर्षभर आपल्याला सुखरूप प्रवास देणाऱ्या लोकलचे ह्याच दिवशी प्रत्येक वर्षाला इथले प्रवासी आणि संस्था ,संघटना स्वागत करत आहेत.
त्या अनुषंगाने आज १६ एप्रिल २०२३ रोजी ह्या लोकलला दहावर्ष पूर्ण होत असताना वाढदिवस तर साजरा केलाच ,मात्र त्यासोबत आपल्या दैनंदिन रेल्वे प्रवासाच्या अडचणी देखील डहाणू वैतरणा प्रवाशी सेवाभावी संस्थेच्या सर्व स्टेशन कमिटीच्या वतीने रेल्वेकडे सादर केल्या.
प्रवाशांची वाढती संख्या तसेच रेल्वेच्या भोंगळ कारभारामुळे दैनंदिन प्रवाशांना होणारा त्रास कमी व्हावा याबाबत डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या वतीने एक दिवसीय प्रवासी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. त्यामध्ये एकाच दिवसात हजारो प्रवाशांनी उत्स्फूर्तपणे स्वतःहून पुढे येत स्वाक्षरी केल्या. डहाणू रोड ९४० ,वानगाव ८७५ , बोईसर ९११ , उमरोळी ९१० , पालघर ८४० , केळवे रोड ८८० , सफाळे ७६० आणि वैतरणा ६८३ इतक्या सह्या असलेली निवेदने डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या सदस्यांनी प्रत्येक स्थानकात सादर केली.
डहाणू रोड ते वैतरणा स्थानकातील हजारो प्रवाशांच्या मागण्या खालील प्रमाणे आहेत
१) सकाळी ४ च्या सुमारास डहाणू येथून लोकल चालू करणे.
२) कोरोना काळात बंद करण्यात आलेली ७:०५ ची लोकल व सफाळे येथील लोकशक्ती गाडीला थांबा पुन्हा चालू करणे.
३) सौराष्ट्र एक्सप्रेस गाडीच्या जुन्या वेळेवर लोकल चालू करणे.
४) वैतरणा ते डहाणू दरम्यानच्या सर्व स्थानकात CCTV कॅमेरा लावणे, भुयारी मार्ग , लिफ्ट बसवणे तसेच शौचालयांची व शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करणे. ५) नवीन वेळापत्रक नुसार काही गाड्यांच्या दरम्यान एक ते दीड तासांचे झालेले अंतर कमी करून विरार पर्यंत निदान ४५ मिनिटात एक गाडी देणे. ७) उपनगरीय लोकल गाड्यांना सायडिंग (Loop) ला काढू नये.
८) १९४२५/२६ मुंबई – नंदुरबार या पॅसेंजर गाडीला रात्री वैतरणा येथे थांबा देणे. ९) उमरोळी स्थानकात शटल व मेमु थांबवण्यात याव्यात.
वरील मागाण्यांसोबतच प्रत्येक स्थानकातील महत्वाच्या विषयांचा समावेशही निवेदनात समाविष्ट करण्यात आला आहे. या मगाण्यांनुसार पश्चिम रेल्वे डहाणू ते वैतरणा दरम्यानच्या प्रवाशांना उपनगरीय सेवा पुरवण्यात अपयशी ठरली आहे हे दिसून येते. गेल्या दहा वर्षात फक्त दोनच नवीन फेऱ्या मोठ्या संघर्षाने मिळाल्या.

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!