रत्नागिरी तालुक्यातील साठरे बांबर लावगणवाडी येथे सोंबा रेडजाई भजन मंडळ तर्फे नुकताच हरिनाम महोत्सव साजरा करण्यात आला.
या वेळी व्यासपीठावर आभार संस्था संचलित रत्नागिरी जिल्हा प्रासादिक भजन मंळाचे सचिव श्री वासुदेव वाघे,श्री पखवाजवादक श्री संदिप आबेरकर , वाडी प्रमुख श्री.संतोष नाडणकर, कशेळी माजी सरपंच श्री.प्रकाश परपते, कशेळी माजी सरपंच श्री. दिपक बावकर, तिखे परिवार लांजा, यादव परिवार आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सर्वाचे स्वागत श्रीफळ शाल देवून करण्यात आले .
धनावडे कुटूंबीयानी गेली अनेक वर्षापासून सुरु केलेला हा महोत्सव म्हणजे संत परंपरेला चालनाच आहे आणि हे भाग्य म्हणजे पूर्व जन्माची पुण्याई असल्याशिवाय कुणाकडूनही हे घडत नसते कारण जगाच्या बाजारात सर्व मिळेल पण हरी नामातला रामकृष्ण कुठेच मिळणार नाही त्यासाठी नामस्मरणाच्या, हरीनामाच्या जय घोषात मिसळावे लागते असे उद्गगार बुवा श्री वासुदेव वाघे यांनी काढले
या वेळी प्रथम सोंबा रेडजाई भजन मंडळ, रत्नागिरी जिल्हा प्रासादिक भजन मंडळाचे भजन, कशेळी मधलीवाडी कातळवाडी, बालमित्र मंडळ मावळतचे वाडी कशेळी, बावकरवाडी कशेळी कोंड या सर्वानी येवून भजनसेवा करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी धनावडे परिवार व वसंत साठले यांनी सहकार्य केले या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ.श्रद्धा तिखे यांनी केले.