बातम्या

पगार न झाल्यामुळे नाट्यगृहाला टाळे लावून संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा.

लगेच पगार काढतो पालिका प्रशासनाने दिले आश्वासन.

प्रतिनिधी : निलेश आखाडे.

रत्नागिरी : गेले दोन महिने पगार न झाल्यामुळे आज  मंगळवारी रत्नागिरीतील  स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर नाट्यगृहातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले. नाट्यगृहाला टाळे लावून कर्मचारी संपावर गेले.
          स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर नाट्यगृहात आठ कर्मचारी आहेत. त्यामध्ये चार चौकीदार, दोन सफाई कामगार, एक लाईटमन आणि एक साऊंडवाला असा समावेश आहे. 2016 पासून हे कर्मचारी साडेसात हजार रूपयांच्या तुटपुंज्या पगारावर काम करतात. हे सर्व कंत्राटी कामगार आहेत. गेले दोन महिने आठ कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही. पगार न झाल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. अखेर मेटाकुटीला आलेल्या कर्मचाऱ्यांनी आजपासून कामबंद आंदोलन पुकारले. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहाला टाळे लावून हे कर्मचारी नगरपरिषद कार्यालयात पोहचले. त्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडे नाट्यगृहाच्या चाव्या त्यांनी जमा केल्या.
           कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचे जाहीर करताच रत्नागिरी नगर परिषदेच्या यंत्रणेला जाग आली आणि आपले पगार तातडीने होतील असे आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिले.
           कर्मचाऱ्यांचे पगार न होण्याचे कारण काय असा सवाल विचारला जात होता. कंत्राटदार कर्मचारी हे वेगवेगळ्या गावातून रत्नागिरी शहर येथे कामानिमित्त येत असतात, अशावेळी त्यांना येण्या जाण्यासाठी खर्चही होत असतो त्यातही त्यांचे तुटपुंजे पगार असे असताना देखील कंत्राटी कामगारांचे पगार थकविले जात असतील तर ही गोष्ट चुकीची असल्याचे बोलले जात आहे. पण याचे वृत्त प्रसिद्ध होताच नगरपालिका प्रशासनाला जाग आली असून तातडीने पगार होतील असे या कर्मचाऱ्यांना सांगितले गेले आहे.
           नगरपालिका कंत्राटदार कर्मचारी माळी विभाग यांचा देखील पगार दुसरा महिना संपत आला तरी झालेला नव्हता या कर्मचाऱ्यांनी देखील असाच पवित्रा एक दिवस घेतला व त्यांचा तातडीने पगार करण्यात आला ही घटना मागील आठवड्यात घडली. कंत्राटी कर्मचारी यांच्यासाठी राखीव निधी का ठेवला जात नाही? असाही सवाल या कामगारांकडून विचारला जात आहे. याच कामगारांचा नव्हे तर रत्नागिरी नगर परिषदेमधील इतर विभागातील कंत्राटी कामगार यांना देखील वेळेवर पगार मिळत नसल्याची तक्रार अनेक कंत्राटी कामगारांची आहे. यामुळे कंत्राटी कामगारांमध्ये नाराजीचा सूर आहे. यावरती रत्नागिरी नगर परिषदेने कायमस्वरूपी उपाय काढावा आणि नगरपरिषदेच्या कंत्राटी कामगारांसाठी वेगळा राखीव निधी राखीव ठेवावा अशी मागणी होत आहे. दखल न्यूज महाराष्ट्र

मोरया मोबाईल्स एक विश्वसनीय दालन
💯उत्कृष्ठ सेवा वाजवी दर💯
आमची ठळक वैशिष्ट्ये🤗
✔️अनुभवी आणि कुशल स्टाफ कडून योग्य मार्गदर्शन
✔️ विक्रीपश्चात सेवा
✔️बाजारभावापेक्षा कमी दर
✔️मोबाईल सोबत हमखास भेटवस्तू 🎁
✔️Emi सुविधा उपलब्ध💳
✔️डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड सुविधा उपलब्ध💳
✔️खात्रीशीर मोबाईल दुरुस्ती उपलब्ध📱🔁👨🏻‍⚕️
✔️जुन्या फोन ला योग्य किंमत देऊन नवीन फोन घेण्याची सुविधा उपलब्ध📱➡️📱
🤗10 वर्ष ग्राहकांची विश्वासार्हता जपण्याची परंपरा🤗
आपली माणस आपलं दुकान🤗😇
बाजारपेठेमध्ये वस्तू च्या किंमतीची खात्री करा आणि योग्य दरात ऑनलाइन पेक्षा स्वस्त खरेदी करा💯💯
आमचा पत्ता✍🏻:-
1] 29, मोरया मोबाईल्स
शंखेश्वर आर्क्रेड, आठवडा बाजार,रत्नागिरी
9422392425
9272682666
2]15, मोरया मोबाईल्स, अंगण प्लाझा, नाचणे रोड, मारुती मंदिर रत्नागिरी

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!