रत्नागिरी : शिंदे फडणवीस सरकारने जाहीर केलेला अर्थसंकल्प हा बारा बलुतेदारांसाठी भटक्या विमुक्त जातीतील घटकांसाठी महत्त्वाचा ठरणारा आहे. या अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक जाती-जमातीतील घटकांसाठी वेगवेगळ्या गोष्टींची घोषणा करण्यात आली आहे आणि म्हणूनच हा अर्थसंकल्प सर्वसामान्य जनतेसाठी सर्वसमावेशक असा आहे असे मत भारतीय जनता पक्षाचे भ. वि. जा. जिल्हाध्यक्ष निलेश आखाडे यांनी व्यक्त केले आहे.
धनगर समाजासाठी महाराष्ट्र मेंढी , शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना केली जाणार आहे. त्यामधून धनगर समाजाला बिनव्याजी कर्जाची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्राचा अर्धसंकल्प सादर होत आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प सादर करताना येणाऱ्या काळात शेतकरी मच्छीमार कोकणातील काजू उत्पादक शेतकरी यांच्यासाठी भरीव तरतूद केली आहे. अपेक्षेप्रमाणे अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पातून धनगर समाजाला मोठा दिलासा देण्यात आला आहे. धनगर समाजासाठी महाराष्ट्र मेंढी , शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना केली जाणार असून, समाजासाठी 10 हजार कोटी रुपयांच्या बिनव्याजी कर्जाची भरीव तरतुद करण्यात आली आहे
त्याचप्रमाणे धनगर समाजाला 1000 कोटी रुपये
महाराष्ट्र मेंढी, शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार, 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार, धनगर समाजासाठी 1000 कोटी रुपये, 22 योजनांचे एकत्रिकरण, मंत्रिमंडळ शक्तीप्रदत्त समितीमार्फत अंमलबजावणी, महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार, 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार, अहमदनगर येथे मुख्यालय असणार, राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेत मेंढीपालनासाठी भरीव निधी दिला जाणार. धनगर समाजाच्या घरकुल योजनेसाठी देखील भरीव तरतूद यामध्ये केली गेली आहे . अशा अनेक घोषणा या अर्थसंकल्पात भटके विमुक्तांसाठी करण्यात आले आहेत. भ.वि.जा. भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी या अर्थसंकल्पाबाबत समाधान व्यक्त केले आहे. दखल न्यूज महाराष्ट्र.
