बातम्या

जिल्हा न्यायालय, रत्नागिरी येथे लोक अभिरक्षक कार्यालय कार्यान्वीत..

रत्नागिरी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या सुधारीत विधी सेवा बचाव पक्ष प्रणाली २०२२ नुसार दिनांक ११ मार्च, २०२३ राेजी मा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांच्या हस्ते जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीमधील लोक अभिरक्षक कार्यालयाचे आभासी पध्दतीने उद्घाटन पार पडले. सदर कार्यालय दिनांक १३ मार्च २०२३ पासून कार्यान्वीत करण्यात आले आहे.
             या कार्यालयात उप-मुख्य विधी सेवा बचत पक्ष वकिल म्हणून ॲड. अ. म. वायकूळ तर सहाय्यक विधी सेवा बचाव पक्ष वकिल म्हणून ॲड. श्रीम. ए. ए. देसाई, ॲड. श्रीम. पी. पी. धोत्रे व ॲड. श्री. वाय. ए. धुरत यांची नेमणूक करण्यात आली आहे. ज्याप्रमाणे फौजदारी प्रकरणांमध्ये फिर्यादी पक्षाची बाजू न्यायालयासमोर सरकारी वकिल मांडतात त्याप्रमाणेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे फौजदारी प्रकरणांमध्ये माेफत विधी सहाय्य मिळण्यासाठी आरोपींनी केलेल्या अर्जानुसार उपरोक्त लोक अभिरक्षक कार्यालयातील वकिलांची नेमणूक केली जाईल व ते बचाव पक्षाची बाजू न्यायालयासमोर मांडतील.
या कार्यालयामार्फत मोफत विधी सेवा ही अटक होण्यापूर्वी पासून ते निकाल झाल्यानंतर वरिष्ठ न्यायालयात अपिल दाखल करेपर्यंत दिली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाचे सचिव तथा वरिष्ठ न्यायाधीश श्री. ए. एन. कुलकर्णी यांनी दिली.
दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात…
जाहिरात…

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!