रोखठोक… भाग १
महेश पानसे
विदर्भ अध्यक्ष
राज्य पत्रकार संघ,मुंबई.
१७२७ चौ.कि.मी क्षेत्रफळात पसरलेला ताडोब अंधारी वाघ पंकल्प शेतकरी, शेतमजूर, पादचाऱ्यांना हवालदिल करून वाघांना तरी नैसगिंक आवास देत आहे का? की आपल्या राजकिय महत्वाकांक्षेपोटी श्रीमंत व्यावसायीकांचे हित जोपासणारे राजकारणी व आणून किती नागरिकांच्या मयतेवर ताव मारणार आहेत हे कळायला वाव नाही? दररोज सरासरी 3 ते5 शेतकरी, शेतमजूर, पादचाऱ्यांना जिवनातून उठविणारी मंडळी वाघांनाही व बफरझोन काठावरील गरीब शेतकऱ्यांच्या जिवनाशी खेळण्याचा गोरखधंदा किती काळ चालविणार हा गहण विषय आहे.
संपुर्ण चंद़पूर जिल्हा व गडचिरोली, गोंदिया जिल्यातील काही भागात वाघोबाचे धास्तीने शेतकऱ्यांनी शेती करणे बंद केले. शेती विकायला काढली. तर वाघोबाचे धास्तीने कुणी घेत नाहीत. 3 चे 21 गेट ताडोबा भ्रमंतीसाठी उघडले गेले. नव्याने श्रीमंतांना एनजॉय करण्यासाठी ताडोबा बफर झोन गेट सुरू करण्याचा डाव कुणासाठी?समजून उमजून पेढा खाण्याचा हा प़कार केवळ अन केवळ विघातक आहे. ही ओरड रास्त आहे हेच म्हणता येईल.
21 गेट च एऐवजी 15 गेट ही नैसगिंक गरज आहे असे बोलले जाते. इकडे तर
22 वा गेट सुरु कण्याचा तगादा श्रीमंत व्यावसायीकांनी वनमंत्री यांचेकडे लावला आहे. या व्यावसायीकांच्या जमिनी बफर झोन काठावर खाली पडल्या आहेत. रिसोर्ट उभे करून पैसा कमवायचा यापेक्षा वाघ, बिबट यांना नैसगिंक रहिवास उपलब्ध करून देऊन शेतकरी, शेतमजूर यांना भयमुत्त वातावरणात पोट भरण्यास मदत करण्याची गरज या धंदेवाईकांना का न समजावी हे कळायला वाव नाही.
ताडोबा अभयारण्याचे रुपांतर आता ताडोबा-अंधारी व्याघ्र पंकल्पामध्ये झाले आहे.1955 मध्ये या प्रकल्पाची
सुरवात झाली. तेव्हा या अभयारण्याचे 1727 चौ.किलोमीटर परिसरात जेमतेम असलेल्या 3 प़वेशद्धारातून पर्यटक व वाघप़ेमींना काही क्षेत्रातून विहार करून या अभयारण्याच्या मनमोहकतेचा आनंद व प्रसंगी वाघदर्शनाचा आनंद लुटता येत असे. वाघ व बिबट या प्राण्यांकरीता अतिशय सुरक्षीत समजल्या जाणाऱ्या
या अभयारण्यात वाघ व बिबट यांची संख्या झपाटयाने वाढली व आज वनविभागाचे माहितीनुसार 151 वाघ व 151 बिबट या प़कल्प क्षेत्रात असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा व भारतातील 47 व्याघ्रप्रकल्पात ताडोबा अंधारी प्रकल्पाचा समावेष असल्याचे अभिमानाने सांगता येत असले तरी गत 5 वर्षापासून या क्षेत्रातील बफर व कोअर झोन मध्ये वाघ व बिबट हल्ल्यात जखमी वा मरण पावलेल्यांची संख्या बघता संपुर्ण चंद़पूर व गडचिरोली जिल्हयाचे आरमोरी, वडसा तालुका क्षेत्रात अतिशय भयग़स्त वातावरणात नागरिकांना वावरावे लागते.
मिळालेल्या माहितीनुसार दरदिवशी सरासरी 3ते5 अशा वाघ व बिबट हल्ल्याच्या घटना कोअर व बफर झोन मध्ये घडत आहेत. व यात वर्षाकाठी शेकडो शेतकरी, शेतमजूर, मेंढपाळ, गुराखी, जळावू इंधन जमा करणाऱ्या स्त्रियासह पादचाऱ्याना आपला जिव गमावला आहे व गमवावे लागत आहे.(क़मश:)
*दखल न्यूज महाराष्ट्र.*