राजकीय

ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगानं बाद केली? याबाबत काय बोलले आदित्य ठाकरे?

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगानं ठाकरे गटाकडून सादर करण्यात आलेले अडीच लाख प्रतिज्ञापत्रं बाद केली आहेत, अशा बातम्या अनेक ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यामुळे निवडणूक आयोगानं ठाकरे गटाचे अडीच लाख प्रतिज्ञापत्रं खरंच बाद केली आहेत का? याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. पण आता माजी मंत्री आणि शिवसेने नेते आदित्य ठाकरेंनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
संबंधित बातमी खोटी असून बातमीच्या स्त्रोतावर विश्वास ठेवू नका, असं स्पष्टीकरण आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलताना म्हणाले. ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे ११ लाख प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली होती. यातील अडीच लाख प्रतिज्ञापत्रे बाद झाल्याच्या वृत्ताबाबत विचारलं असता आदित्य ठाकरेंनी संबंधित बातमी खोटी असल्याचं सांगितलं आहे. तसेच त्या बातमीवर विश्वास ठेवू नका, असं आवाहनही आदित्य ठाकरेंनी केल आहे. संबंधित बातमीबाबत ठाकरे अथवा शिंदे गटातील कोणत्याही नेत्यानं अधिकृत स्पष्टीकरण दिलं नव्हतं मात्र आदित्य ठाकरे यांनी हे सर्व समज गैरसमज दूर करून सदरची बातमी खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे.
दखल न्यूज महाराष्ट्र.

▶️ जाहिरात..
▶️भारतीय जनता पार्टी पुरस्कृत यंग बॉईज ग्रुप आयोजित श्री दुर्गामाता चषक जिल्हास्तरीय नाईट हॉलीबॉल स्पर्धा परटवणे खालचा फगरवठार.
दखल न्यूज महाराष्ट्र.

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!