प्रतिनिधी : प्रथमेश बोडेकर
लांजा : कोकणामध्ये दरवर्षी अनेक ठिकाणी वनवा लागण्याचे प्रकार घडत असतात त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असते. त्यासाठी शेतकरी वैयक्तिकरित्या आपल्या आंबा काजू बागेचे संरक्षण करण्यासाठी आपल्या परीने उपाययोजना करीत असतो. अशा वनव्यामध्ये आंबा व काजू बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते.
लांजा तालुक्यातील लावगण येथे सतत दोन दिवस लागलेल्या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात आंबा ,काजूच्या झाडांचे नुकसान झाले .आंबा ,काजूला आलेला मोहर जळून खाक होऊन आंबा व काजूचे नुकसान झाले त्यामुळे आंबा व काजू बागायतदार ऐन पीक हंगामात मोठ्या आर्थिक संकटात आले आहेत , कोणत्या कारणामुळे आग लागली याचे कारण आजतागायत समोर आलेले नाही, त्यामुळे पंचनामा करून किती आर्थिक मदत प्राप्त होईल याचे उत्तर अनुत्तरित आहे, जास्तीत जास्त मदत प्राप्त व्हावी हीच बागायतदारांनी इच्छा व्यक्त केली आहे .
दखल न्यूज महाराष्ट्र.
