रत्नागिरी : अजय तेंडुलकर यांनी केलेल्या आरोपांचे स्पष्टीकरण रोखठोक शब्दात सचिन गिजबले यांनी दिले असून ते म्हणतात की सरपंचांच्या हुकुमशाहीमुळेच गावातील विकासकामांना बसतोय खो, शालेय विद्यार्थाना देखील होतोय नाहक त्रास अशा मथळ्याची खोटी खोडसाळ बातमी स्थानिक वृत्त सेवेच्या माध्यमातून दिली आहे. आपल्या पदाचा गैरवापर करून, डोर्ले गावचे रहिवाशी आणि शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे पावस विभाग संघटक श्री अजय तेंडूलकर यांनी सरपंच प्रा.सचिन गिजाबिले याची बदनामी केली आहे. तसेच शिवसेना स्टाईल उत्तर देण्यात येईल असे म्हंटले आहे.
मौजे दाभीळ आंबेरे गावातील जि.प.मराठी शाळेसंदर्भात दुरुस्तीचे कोणतेही टेंडर झालेले नसताना शाळेची कौले काढून ठेऊन विध्यार्थ्याना वेठीस धरण्याचे काम केवळ सरपंचाच्या हुकुमशाहीमुळे चालू आहे. असे बेजबाबदार विधान शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे पावस विभाग संघटक श्री. अजय तेंडूलकर यांनी केले आहे. पदाधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती समजून, तपासून जबाबदारीने विधाने करायला हवीत. यावरून श्री. अजय तेंडुलकर यांना आपल्या पदाचे भान नसल्याचा प्रत्यय येत आहे. श्री अजय तेंडुलकर यांनी केलेले तिन्ही कामांबाबतच आरोप खोटे खोडसाळ आणि बनावट आहेत. याबाबत सविस्तर खुलासा सरपंच प्रा.सचिन गिजाबिले यांनी केला आहे.
१) सरपंच प्रा. सचिन गिजाबिले यांनी शाळेबाबत ग्रामस्थ, पालक यांची सभा घेउन शाळेच्या दुरुस्ती विषयी माहिती दिली. सदर शाळा ही पूर्णपणे मोडकळीस आल्यामुळे. ग्रामस्थ, पालक यांनी कौलाचे नुकसान होऊ नये म्हणून कौले उतरून ठेवावीत अशी मागणी केली. त्यानुसार कौले उतरून ठेवण्यात आली आहेत. दिनांक २० / ०२ / २०२३ रोजीच्या ग्रामसभेत शाळेच्या दुरुस्ती कामच्या टेंडर प्रक्रियेची संपूर्ण माहिती सभा अध्यक्ष सरपंच प्रा. सचिन गिजाबिले यांनी देऊन टैंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. या ग्रामसभेला अजय तेंडुलकर उपस्थित होते. यात हुकुमशाही कशी ? याचा खुलासा ग्रामस्थांसमोर अजय तेंडुलकर यांना करावाच लागेल अशी नाहक बदनामी ग्रामस्य कधीही सहन करणार नाहीत अशी माहिती सरपंच प्रा. सचिन गिजाबिले यांनी दिली आहे. जाणूनबुजून पालकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात येत आहे. मे महिन्यात काम पूर्ण करण्यात येईल असे सांगून देखील सरपंचांना नाहक त्रास देण्याच्या हेतूने त्यांच्याकडे पालकांना पाठून सरपंच आणि पालक यांच्यात वाद होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. श्री. अजय तेंडुलकर हे ग्रुप ग्रामपंचायत डोर्लेचे सदस्य असताना याच शाळेच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. शाळा तोक्ते वादळा पूर्वीच मोडकळीस आलीच कशी? असा प्रश्न ग्रामवासियांना पडला आहे. या बाबतही चौकशी करण्यात येणार आहे असे सरपंच यांनी सांगितले आहे. श्री अजय तेंडुलकर तोक्ते वादळाचे कारण पुढे करतील. परंतु वस्तुस्थिती कधीही खोटी बोलत नाही..

२) वनीकरणासाठी देण्यात आलेली ग्रुप ग्रामपंचायत डोर्लेकडे शिल्लक असलेली झाडे मेलेली आहेत. त्यामुळे ग्रामस्थ कायदेशीर आंदोलन करणार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी अर्धवट ज्ञानाच्या आधारे मागणी श्री. अजय तेंडुलकर यांनी केली आहे. मात्र त्यांनी खरी वस्तुस्थिती सरपंच यांचेकडून समजून घ्यायला हवी होती परंतु तसे न करता बदनाम करण्याच्याच हेतूने खोटी माहिती पसरवलेली आहे.
सरपंच प्रा. सचिन गिजाबिले यांनी ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामसेविका यांना झाडांची देखभाल करण्याच्या सुचना सातत्याने देऊन देखील त्यांनी त्याची दखल घेतलेली नाही त्यामुळे सरपंच प्रा. सचिन गिजाबिले यांनी मा. गटविकास अधिकारी साहेब, पंचायत समिती रत्नागिरी यांच्याकडे ग्रामसेविका यांचे विरुद्ध दिनांक- १७/०१/२०२३ रोजी तक्रार केलेली आहे त्या तक्रारिची चौकशी दिनांक- २३/०९/२०२३ मा.गटविकास अधिकारी साहेब, पंचायत समिती रत्नागिरी यांचे दालनात झाली असून ग्रामसेविका यांच्याकडून आर्थिक नुकसानभरपाई वासुली करण्याच्या सुचाना मा. गटविकास अधिकारी साहेब यानी दिल्या आहेत. त्यामुळे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यास जबाबदार नाहीत. ही वस्तुस्थिती खरी असून याविषयी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे पावस विभाग संघटक श्री अजय तेंडुलकर यांनी सत्यता पडताळून न पाहता बदनामीकारक रोकठोक आरोप करणे पावस विभाग संघटक या महत्वाच्या पदावर कार्यरत असणाऱ्या या पदाधिकाऱ्यांना शोभनीय नाही.
३) ग्रामपंचायत शेजारी असलेल्या दवाखान्यासमोरील फेवर ब्लॉकचे काम सरपंच यानी याबवून ठेवल्याचा बदनामकारक आरोप श्री अजय तेंडुलकर यांनी केला आहे आरोप करण्यापूर्वी याही कामाविषयी सत्य श्री अजय तेंडुलकर यांनी जाणून घेतालेले नाही. हे काम सुरु असतानाच ग्रुप ग्रामपंचायत डोर्लेची ग्रामसभा झाली. त्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी या कामाविषयी माहिती विचारली ग्रामस्थ श्री अमृत पोकडे यांनी सादर काम कोणत्या योजनेतून सुरु आहे त्या कामाचे इस्टीमेंट ग्रामपंचायतिकडे आहे कारल्याचा मक्तेदार कोण? असे प्रश्न यामसमेत विचारण्यात आले. त्यावर आपल्याला याबद्दल कोणतीही माहिती नाही, असे सरपंच यांनी सांगितले. त्या ग्रामसभेत उपस्थित असणाऱ्या आरोग्यसेवकांना या कामाबद्दल माहिती देता आली नाही. संबंधित मक्तेदाराकडून इस्टीमेंट घेऊन त्या कामाचे स्वरूप समजून घेण्यात यावे. त्यासाठी सरपंच आणि आरोग्यसेवक यांनी एन.आर. एच. एम. यांचेकडे संपर्क साधून संबंधित मक्तेदाराला इस्टीमेंट घेऊन ग्रामपंचायतीत येण्याचे सांगण्यात आले. सरपंच प्रा. सचिन गिजाबिले यांनी मक्तेदाराला आज रोजी पर्यंत काम थांबविण्याबत लेखी नोटीसही दिलेली नाही. काम थांबविण्यात आलेले नसताना देखील लोकांची दिशाभूल करण्याचे काम श्री अजय तेंडुलकर करीत आहेत,
मा. सरपंच यांनी अडीच वर्षात किती निधी आणला? असा प्रश्न उपस्थित करून ना. मा. उदयजी सामंत साहेब, उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री जिल्हा, रत्नागिरी यांच्यामुळे गावात विकासाची गंगा आल्यामुळे सरपंचांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. असे विधान श्री. अजय तेंडुलकर यांनी केले होते. यावर सरपंच प्रा. सचिन गिजाबिले यांनी सविस्तर खुलासा केला आहे. सरपंच प्रा. सचिन गिजाबिले हे कोणत्याही राजकीय पक्षाचे सदस्य पदाधिकारी, लोकप्रतिनिधी नाहीत. गाव विकास पॅनल डोलेंचे सरपंच पदी कार्यरत आहेत. असे असतानाही ना. मा. उदयजी सामंत साहेब, उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य, तथा पालक मंत्री जिल्हा रत्नागिरी, जि.प. सदस्या आरती तोडणकर, माजी उपसभापती श्री. सुनीलजी नावले साहेब, पंचायत समिती, रत्नागिरी, आणि पंचायत समिती सदस्य श्री सुशांतजी पाटकर यांनी गावाच्या विकासासाठी लाखोनी रूपयांचा निधी दिला आहे. सरपंच प्रा. सचिन गिजाविले यांनी हे सत्य कधीही नाकारलेले नाही. या सर्वांच्या अभिनंदनाचा ठराव सरपंच प्रा. सचिन गिजाबिले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते करण्यात आला आहे. तसेच ना. मा. उदयजी सामंत साहेब उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य, तथा पालक मंत्री जिल्हा रत्नागिरी याचा जाहीर सत्कार सरपंच प्रा. सचिन मिजाविले यांनी केला आहे.

सरपंच प्रा. सचिन गिजाविले हे नेतेगिरी करीत नसून ते लोकामध्ये जावून काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या पाठीशी आमच्या सारख्या लोकप्रतिनिधांनी उभे राहिले पाहिजे असे सत्कार प्रसंगी बोलताना २५० लोकांच्या साक्षीने त्यांनी मत मांडले आहे. सत्काराला श्री अजय तेंडुलकर उपस्थित राहिलेले नाहीत ही मोठी शोकांतिका आहे. निधी कोणाचाही असो, तो आम्ही स्वीकारनारच ही भूमिका ठेऊन सरपंच गावात काम करीत आहेत. यात सरपंचांच्या पायाखालची वाळू सरकण्याचा कोणताच प्रश्न उद्भवत नाही.
मागील पाच वर्षे श्री अजय तेंडुलकर हे ग्रामपंचायत सदस्य असताना त्यांना निधी उपलब्ध करता आलेला नाही प्रथम आपल्या सदस्य कालखंडाचे अवलोकन करावे आणि मगच इतरांना प्रश्न विचारावेत असा इशारा सरपंच यांनी दिला आहे. सरपंच प्रा. सचिन गिजाबिले यांच्या कालखंडात ते कोणत्याही राजकीय पक्षाचे सदस्य, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी नसतानाही निधी प्राप्त झाला हा सरपंचाच्या कर्तुत्वाचा सन्मान असतो असे सरपंच यांनी म्हटले आहे. शासनाच्या विविध योजनाचा निधी आणि सर्व लोकप्रतिनिधीनी दिलेला निधी मिळून सुमारे दोन कोटीपेक्षा जास्त निधी ग्रामपंचायतीस प्राप्त झाला आहे यामुळेच श्री अजय तेंडुलकर यांना आपले भवितव्य अंधारात असल्याची जाणीव होऊन ते मानसिकदृष्ट्या घायाळ झालेले आहेत त्यामुळेच ते बेताल वक्तव्य करीत आहेत. प्राप्त निधी कोणत्या कामासाठी किती मंजूर झाला आहे. याची सविस्तर माहिती मे महिन्यात होणाऱ्या गाव विकास मेळाव्यात देण्यात येणार आहे.
सरपंच, उपसरपंना अंधारात ठेवून गावाचा कारभार अशा मथळ्याची बातमी नुकतीच सरपंचांनी प्रसिद्ध केली होती त्या बातमीतील सर्व मजकूर सत्य असून त्याबाबतचे सर्व पुरावे आजही आपल्याकडे उपलब्ध असून कोणतेही गैरसमज पसरविलेले नाहीत असे सरपंच यानी म्हटले आहे. कटू सत्य स्वीकारण्याची मानसिक ताकद श्री अजय तेंडुलकर यांच्याजवळ नसल्यामुळे या बातमीतून गैरसमज पसरविल्याचे म्हटले आहे. आपल्या पदाचा गैरवापर करून असे गैरसमज पसरविणे थांबविले नाही तर शिवसेना स्टाईलने उत्तर देवू अशी इशारा सरपंच प्रा. सचिन गिजाबिले यांना दिली आहे यामुळे डोर्ले, दाभीळ आंबेरे आणि पावस दशक्रोशीमध्ये असंतोष निर्माण झाला असून सरपंचांची बदनामी केल्याबद्दल आणि धमकी दिल्याबद्दल शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे पावस विभाग संघटक श्री अजय तेंडूलकर यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दखल न्यूज महाराष्ट्र..
