प्रतिनिधी :(प्रथमेश बोडेकर)
रत्नागिरी: रत्नागिरी लातुक्यातील चांदोर ,नाखरे आदी भागात काही दिवसांपासून गवा रेडा ग्रामस्थांना ये जा करताना दिसत आहे. अनेकदा लोकांनी पाहिलेही आहे. त्यामुळे रात्री प्रवास करताना नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अद्याप गवा रेड्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे समोर आलेले नाही. कोणत्याही प्रकारचे नुकसान होण्याअगोदर वन विभागाने वेळीच याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.