खाजगी मालकीच्या जागेत वृक्षतोड; अवैध वृक्षतोडीचे समर्थन नाही
चिपळूण (ओंकार रेळेकर) तालुक्यात खाजगी मालकीच्या जागेत वन विभागाची परवानगी घेऊन वृक्षतोड केली जाते. सरकारी वनक्षेत्रात वृक्षतोड केली जात नाही अवैध वृक्षतोडीचे आम्ही समर्थन करत नाही अशी भूमिका रत्नागिरी जिल्हा लाकूड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र पालांडे यांनी आज पत्रकार परिषदेत मांडली.तालुक्याच्या पूर्व विभागात सुरू असलेल्या वृक्षतोडीबाबत सामाजिक संघटनांनी आवाज उठविला आहे अवैध वृक्षतोड बंद झाली पाहिजे अशी मागणी काही सामाजिक संघटना करीत आहे या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील लाकूडतोड संघटनेची बैठक आजची मध्ये पार पडली.बैठकीची माहिती देताना श्री पालांडे म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांशी जंगल खासगी मालकीचे आहे. हे जंगल शेतकऱ्यांच्या मालकीची आहे. शेतकरी महसूल आणि वन विभागाकडून जंगल तोडीचे रीतसर परवानगी घेतात. त्यानंतर जंगल तोडले जाते. तोडलेल्या भागात पुन्हा वृक्ष लागवड केली जाते. त्यासाठी वन विभागाकडून सवलतीच्या दरात आम्हाला रोपे दिली जातात. शेतकऱ्यांचे जंगलावर प्रेम आहे. जंगल हेच शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाचे साधन आहे. त्यामुळे मुळासकट जंगल तोडले जात नाही. झाडांचे बुंदे जमिनीत ठेवले जातात पावसाळ्यात त्यांना फुटवा फुटतो आणि दोन वर्षात पुन्हा रान बहरते. जंगल तोडीच्या व्यवसायामध्ये पूर्वीसारखे लोक आता राहिले नाही. पर्यावरण प्रेमींचा त्रास जास्त होत असल्यामुळे अनेकांनी आपला व्यवसाय बदलला आहे. वृक्षतोड झाली नाही तर स्मशानभूमी लागणारी लाकडे मिळणार नाही. अनेक कारखानदारांना बॉयलरसाठी लागणारा लाकूड साठा उपलब्ध होणार नाही. घर बांधण्यासाठी सेंट्रिंगचे सामान उपलब्ध होणार नाही. एकूणच लाकूड तोडीच्या उद्योगावर शेतकरी व्यवसायिक कारखानदार अवलंबून आहेत. केवळ जंगलतोडीमुळे महापूर येतो असे म्हणणेही चुकीचे आहे. कारण महाबळेश्वर मध्ये वृक्षतोडीला बंदी असताना तिथे भुस्कलन होते. जंगल वाचले पाहिजे या मताशी आम्ही सहमत आहोत. किंबहुना जिल्ह्यातील जंगलव्याप्त क्षेत्र वाढवण्यासाठी आमचेही प्रयत्न आहेत. शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेत आम्ही सर्व शेतकरी आणि लाकूडतोड व्यवसायिक सहभाग घेत असतो. यापुढेही आम्ही वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होऊन आणि जिल्ह्यात अवैध लाकूडतोड होत असेल तर त्याचे आम्ही समर्थन करणार नाही. यावेळी सरचिटणीस संजय थरवळ, तालुकाध्यक्ष अनंत पवार, रुपेश खांडेकर, महेश शिंदे, पांडुरंग शिंदे, प्रीतम कदम, नंदू शिंदे, रवींद्र रहाटे,मनोज शिंदे,रवी काणेकर आदी उपस्थित होते.
