रत्नागिरी – (प्रमोद तरळ) खेड तालुक्यातील तालुक्यापासून जवळजवळ ६५ किलोमीटर अंतरावर चोरवणे गडकरवाडी वसलेली आहे.एप्रिल आणि मे महिन्यात या वाडीमध्ये पाणी समस्या निर्माण होते.चोरवणे गडकरवाडी ग्राम वासीयांचा पाणी प्रश्न सोडण्यासाठी जल फाऊंडेशने पुढाकार घेतला.ही समस्या समाजसेवक खालीद भाई चौगुले यांच्याजवळ मांडली.खालिद भाई यांचे मित्र जावेद अहमद (दुबई यूएई) यांच्याकडून आई वडिलांच्या स्मरणार्थ बोरींगसाठी आर्थिक स्वरूपात मदत मिळाली.
सोमवार दिनांक १७ एप्रिल २०२३ रोजी चोरवणे गडकरवाडीत बोरींग मारून पाणी प्रश्न मार्गी लावला.चोरवणे गडकरवाडी ग्राम वासियांच्या वतीने जावेद अहमद (दुबई यूएई),समाजसेवक खालिद भाई चौगुळे साहेब,जल फाऊंडेशचे अध्यक्ष नितिन जाधव साहेब,जल फाऊंडेशनचे सल्लागार वसंत मोरे साहेब,जल फाऊंडेशनचे उपसचिव सुदर्शन जाधव,जल फाऊंडेशन टीमचे,नाडकर बोअरवेल चे नाडकर साहेब आणि त्यांचे सहकारी यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.तसेच समाजसेवक श्री.प्रकाश शिंदे आणि ग्रामस्थांनी बोरींग लावण्याच्या कामात खूप असे सहकार्य केले. दखल न्यूज महाराष्ट्र.
