बातम्या

बारसुतील जमीनधारक शेतकऱ्यांना जमीनीच्या बदल्यांत कंपनीमध्ये शेअर्स देऊन मालक बनवा – सदाभाऊ खोत

राजापूर (प्रमोद तरळ) तालुक्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पावरून राजकीय वाद तीव्र होत चालला आहे. समर्थक आणि विरोधक आपापली बाजू सातत्याने मांडण्याचा प्रयत्न करत आहेत स्थानिक ग्रामस्थांनी या प्रकल्पा विरोधात दंड थोपटले आहेत
‌‌. स्थानिक शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला ठाम विरोध दर्शविल्यांने सरकार पुढे पेच निर्माण झाला आहे परंतु कोकणातील बारसु रिफायनरी प्रकल्पासाठी शेतकऱ्याच्या जमिनी घेणार असाल तर शेतकऱ्याला त्या कंपनीमध्ये शेअर्स देऊन मालक बनवा. बारसू मध्ये होणाऱ्या रिफायनरी मध्ये शेतकऱ्यांना सामावून घेतल्यास शेतकऱ्याला आयुष्यभराचा दिलासा मिळेल. असं जर का झालं तर शेतकऱ्याचा विरोध या प्रकल्पाला असणार नाही, असे मत माजी राज्यमंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले. दखल न्यूज महाराष्ट्र

जाहिरात…

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!