नळपाणी योजनेची चौकशी करा आणि अनधिकृत बांधकामांवर कावाईची भाजपची प्रमुख मागणी..
रत्नागिरी : भाजपाने दि. 14 सप्टेंबर रोजी रत्नागिरी नगर परिषद नळपाणी योजनेच्या लेखापरिक्षणाबाबत मा. जिल्हाधिकारी, जीवन प्राधिकरण यांना पत्र दिले होते. नगर परिषद रत्नागिरी येथील नळ पाणी योजनेची स्थिती सुमारे 80 ते 90 कोटी खर्च करूनही दयनीय झाली आहे. योजना सुरू होण्याआधीच पाण्यात गेल्याची दिसत असून तत्कालीन मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मंजूर केलेली योजना जीवन प्राधिकरण यांचे हलगर्जीपणामुळे व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे पूर्ण होण्याच्या आशाच दिसत नाही. ज्याची चौकशी लावण्यासाठी पत्र भाजपा ने दिले होते.
चंपक मैदान ते साळवी स्टॉप ते कुवारबाव येथील अनधिकृत कामांवर कारवाईबाबत ही भाजपाच्या वतीने पत्र दिले होते. कुवारबाव येथील मुलांच्या खेळण्यासाठीच्या मैदानावर कारवाची तत्परता प्रशासनाने दाखविली होती तशीच कारवाई इतर सर्व खाजगी अनधिकृत वाणिज्य व इतर इमारतींवर दाखवावी यासाठी पत्र जिल्हाध्यक्ष यांनी जिल्हाअधिकारी यांना दिले होते. परंतु अडीज महिने होऊनही यासर्व पत्रांची मा. जिल्हाधिकारी यांचे कडून कोणतीही दखल घेतली गेली नव्हती त्यामुळे नाइलाजाने भाजपाने या कारवाईसाठी दि. 19-12-2023 रोजी पासून उपोषणाची नोटीस मा. जिल्हाधिकारी यांना दिली आहे. व आता तरी जिल्हाधिकारी कारवाई करतील ही अपेक्षा व्यक्त केली आहे आता याबाबत जिल्हा प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या पत्राची प्रत मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी व बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण साहेब यांना ही पाठविण्यात आली आहे. ह्या वेळी जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे,तालुका अध्यक्ष दादा दळी, शहर अध्यक्ष राजन फाळके, तालुका सरचिटणीस सुशांत पाटकर, शहर सरचिटणीस मंदार मयेकर, बाबू सुर्वे व निलेश आखाडे आदी उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र.