बातम्या

माता रमाई यांच्या त्यागमय जीवनाचा महिलांसमोर आदर्श : सौ विद्याताई जाधव. चिपळूण येथे डॉ. आंबेडकर स्मारक भवनात माता रमाई आंबेडकर जयंती, नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचा सत्कार सोहळा संपन्न.

चिपळूण : (ओंकार रेळेकर ) विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची अर्धांगिनी माता रमाई यांचे जीवन सर्वांसमोर प्रेरणादायी असे आहे. रमाईंच्या त्यागाला तोड नाही. त्यांनी केलेल्या त्यागामुळेच बाबासाहेबांच्या हातून अद्वितीय असे महान कार्य घडले. आणि नवभारताची, नव समाजाची निर्मिती झाली. त्यामुळे रमाईंचा आदर्श कायम बाळगला पाहिजे, असे स्पष्ट प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या व शिक्षिका सौ विद्याताई जाधव यांनी येथे केले.

जाहिरात…


            चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती ( रजि.) चिपळूण, मुंबई व माता रमाई आंबेडकर वाचनालय, चिपळूण यांच्यावतीने संस्थेच्या चिपळूणतील विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनात आज ( मंगळवारी )माता रमाई आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेच्या स्थानिक कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत हे होते . यावेळी विचारपिठावर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे मुंबई मुख्य कमिटीचे सरचिटणीस हरिश्चंद्र पवार, हिशेब तपासणीस अनंत जाधव, संस्थेचे उपाध्यक्ष व कवी राष्ट्रपाल सावंत , सुदेश गमरे, जिल्ह्याचे माजी सभापती मनोहर मोहिते, हिशेब तपासणीस दिवाकर जाधव, न्यायदान कमिटीचे अध्यक्ष दिलीप मोहिते, धम्म कमिटीचे अध्यक्ष आनंत पवार, शिक्षण कमिटीचे अध्यक्ष संदेश पवार, सामाजिक कार्यकर्ते राजूभाई जाधव, माजी चिटणीस रमाकांत सकपाळ, धम्म कमिटीचे माजी अध्यक्ष प्रभाकर सकपाळ यांच्यासह विभागाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी नुकत्याच पार पडलेल्या चिपळूण तालुक्यातील 32 ग्रामपंचायतीच्या निवडणुकातील निवडून आलेल्या संस्थेच्या सभासद असलेल्या सरपंच ,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हरिश्चंद्र पवार यांनी तर माता रमाई यांच्या प्रतिमेला सौ विद्याताई जाधव यांनी पुष्पहार अर्पण केला. धम्म कमिटीचे माजी अध्यक्ष प्रभाकर सकपाळ यांनी बौद्ध पूजा पाठ घेतला.सौ विद्या जाधव यांनी ‘ माता रमाईंचे त्यागमय जीवन व आजची महिला ‘ या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. त्यापुढे म्हणाल्या, बाबासाहेबांना अत्यंत खंबीर अशी साथ रमाई यांनी दिली . त्यामुळेच बाबासाहेब विविध आघाड्यांवर यशस्वीपणे काम करू शकले आणि दुसरीकडे रमाईंनी स्वतःच्या शिरावर स्वतःचा संसार घेऊन आपला संसाराचा रथ पुढे हाकला. अनेक अडचणी व  संकटांवर मात करून जीवनात संघर्ष कसा करायचा असतो ? आणि त्यावर कशी मात करायची असते ?याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून माता रमाईंकडे पहावे लागते. त्यांच्याकडून सबंध महिलांना खूप मोठी प्रेरणा मिळते . रमाईंच्या जीवनातील दुःख  ही आजच्या महिलांसमोर नाहीत . त्यामुळे आजच्या महिलांनी आपली कौटुंबिक व सामाजिक जबाबदारी ओळखून पुढे आले पाहिजे असे सांगितले.प्रमुख अतिथी हरिश्चंद्र पवार यांनी आपल्या मनोगतात संघटनेचे महत्त्व अधोरेखित करून आपली संस्था या पुढच्या काळात कशी गतिमान काम करेल याविषयीची मांडणी केली. तसेच संस्थेच्या वतीने काढण्यात आलेल्या राजहंस पतपेढीच्या संदर्भात माहिती दिली .आगामी दोन महिन्यात पतसंस्थेचे अधिकृतपणे उद्घाटन केले जाईल असे सांगितले.अध्यक्षीय भाषणात चंद्रकांत सावंत यांनी माता रमाई जयंतीचा सोहळा आपल्या चिपळूण तालुक्यात आता सार्वत्रिकरित्या सर्वच गावातून साजरा होत आहे ही आनंदाची बाब असल्याचे सांगून त्याची सुरुवात आपल्या संस्थेच्या माध्यमातून आठ वर्षांपूर्वी करण्यात आल्याचे नमूद केले. संस्थेच्या शिक्षण समितीच्या वतीने माता रमाई आंबेडकर वाचनालय सुरू झाल्यापासून रमाईंची जयंती तालुकास्तरावर सुरू करण्यात आली आणि तेव्हापासून या जयंतीची सुरुवात झाली याचे समाधान वाटते असे सांगितले .त्याचप्रमाणे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनाही यथोचित मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमाला उल्हास कदम, संजय जाधव, विलास सकपाळ गुरुजी, नारायण जाधव , प्रकाश बल्लाळ, प्रमोद कांबळे, विलास गमरे, सुनील गमरे, महेश कदम ,आदेश मोहिते, शरद गमरे, रोहित जाधव, संजय मोहिते गुरुजी,  दत्ताराम मोहिते, राहुल जाधव ,जयसिंग सावंत ,सौ मनीषा गमरे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते  .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश पवार यांनी तर आभार प्रदर्शन राष्ट्रपाल सावंत यांनी केले.या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या विद्याताई जाधव, सरपंच सुदेश गमरे- बामनोली ,सौ.रूपाली मोहिते – उमरोली, सौ श्रावणी मोहिते – भोम, उपसरपंच-  संजय जाधव (करंबवणे), उमेश सकपाळ (भिले), ग्रामपंचायत सदस्य – सौ सानवी गमरे (बामनोली), तुषार गमरे (पेढे), सौ सारिका पवार( करंबवणे), सौ नंदिनी पवार ( करंबवणे), सौ विद्या सकपाळ (भिले ), दिव्या कदम (कापरे),मिलिंद मोहिते ( उमरोली),दिलीप जाधव(असुर्डे), विश्वनाथ कदम (शिरवली), संजय जाधव (पोफळी), संजय जाधव (कौंढरताम्हणे) यांचा सत्कार करण्यात आला.
फोटो : पोफळी ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्य संजय जाधव यांचा सत्कार करताना माजी जि.प सदस्य मनोहर मोहिते यांच्या समवेत सौ.मनीषा गमरे,राजू जाधव छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)
दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात..

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!