खेड प्रतिनिधी :अक्षय कदम
खेड : सालाबाद प्रमाणे याही वर्षी कोकणात ही शिमगा महोत्सव साजरा होत असताना रत्नागिरी जिल्यातील खेड तालूक्यातील जामगे किल्लेमाची या गावची ग्रामदेवता श्री कोटेश्वरी मानाई प्रसन्न ह्या वर्षी या गावामध्ये आगमन होत असताना मानाची पालखी जामगे येथून ते किल्लेमाची गावात घेऊन येत असताना या गावातील लहान थोर, महिला मंडळ या पालखीच्या सोहळ्यात सामील होऊन मोठ्या आनंदाने ढोल ताश्याच्या फटाके गुलाल उधळीत किल्लेमाची गावातील साणेवर आणण्यात आली दरवर्षी प्रमाणे साणेवर ५ फेरी मारून सानेवर बसविण्यात आली या वेळी या गावचे असणारे चाकरमानी आणि गावातील तरुण मुलांनी देवी साठी चांदीची नान आणि २ साड्या देण्यात आल्या.साणेवरून पालखी सालाबाद प्रमाणे मारुती मंदिरात बसवण्यात येते त्यानंतर मारुती मंदिरात थोडा वेळ पालखी नाचून ती मानकरांच्या घरी जाते या वर्षी चे मानकरी असणारे कदम भावकी मधील असणारे त्याच्या घरी घेवून जाण्यात आली. त्यानंतर पालखी १५ ते २० मिनिट बसवून पूजा करून पालखी गावातील सर्व घर घेण्यास सुरवात केली जाते. आणि पालखी ही या गावातील प्रतेकांच्या घरी जाते आपल्या भक्तांना भेटली जात असते . रात्री ९ वाजे पर्यंत पालखी घरांमध्ये फिरत असते .त्यानंतर मान करायच्या घरी गावातील व पालखी सोबत आलेले भक्त जन यांना महाभोजन देतात . सर्वांचे महाभोजन झालं की पालखी साणेवर नाचविण्यासाठी घेवून जातात. किल्लेमाची गावात पालखी नाचवत असणारा या वाडीतील महिला ,लहान मुले ,व वाडीतील किल्लेमाची ग्रामस्थ आणि युवा मोठ्या हर्षा ने ढोलाच्या ताशाच्या आतिष बाजी असते ,फटाके लावले जातात पालखी नाचवली जाते ,तसेच या पालखी चा सोहळा पाहण्या साठी आजूबाजूला गावातील लहान थोर माणसे पण येतात आणि ते पण पालखी नाचविण्याचा आनंद घेतात. हे या गावातील वैशिष्ट आहे पालखी ही होळी वर २ ते ३ तास नाचवून परत मारुती मंदिरात १ ते २ तास नाचवली जाते .दुसऱ्या दिवशी पालखी किल्ल्यावर जाते पण किल्या वरून आणल्यावर वाडीतील बाकी राहिलेले घर घेवून सायंकाळी मोरेवाडी या गावात देण्यात येते.किल्लेमाची गाव हे सह्याद्री पर्वत रांगे मधिल एक उंच गाव आहे येथील वातावरण हे चांगल आहे. तसेच या गावात शिवकालीन किल्ला देखील आहे अस हे सुंदर गावाला नक्की भेट देवून जा. तसेच कोकणातील कोणत्याही गावात तुम्ही नक्की शिमगा येऊन बघा. दखल न्यूज महाराष्ट्र.
