सागरामध्ये मच्छीमारी करत असताना अनेकदा मच्छीमारांना विविध संकटांना तोंड द्यावे लागत असते अशावेळी मच्छीमारांचा अपघातामध्ये मृत्यू देखील होतो. तसेच सतत सागरामध्ये असल्याने मच्छीमारांना हृदयविकाराचा देशील त्रास संभवत असतो महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती कार्यकारिणी समवेत सागरी मच्छीमार संघटना महाराष्ट्रचे अध्यक्ष मा. दामोदर लोकरे यांजकडून मा. मंत्रीमहोदयांना निवेदन सादर करण्यात आले आहे. दि. 26 जून रोजी मंत्रालयामध्ये सन्मा. नाम. सुधीर मुनगंटीवार (मा. मत्स्य व्यवसाय मंत्री महाराष्ट्र राज्य ) यांचेसोबत महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती आणि ईतर मच्छिमार संघटनांच्या शिष्टमंडळांनी भेट घेतली. या भेटीत मच्छिमारांच्या विविध समस्या आणि मागण्यांबाबत मंत्री महोदयांसमोर निवेदन करण्यात आले, याप्रसंगी सागरी मच्छीमार संघटनेतर्फे मच्छिमारांची सद्यस्थिती नमुद करीत अपघाती निधनानंतर मिळणारी शासकीय मदत 1 लाखावरुन किमान रु. 10 लाख करण्यात यावे यासाठी अध्यक्ष दामोदर लोकरे यांच्यावतीने मंत्री महोदयांना निवेदन देण्यात आले. त्याचप्रामाणे संघटनेच्या वतीने या निवेदनात मच्छिमारांच्या अपघाती निधनासोबतच मच्छिमारी करताना हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्युंचे प्रमाण अधिक असल्याचे नमुद करत याबाबतही शासकीय मोबदला मिळावा ही महत्वाची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी त्यांच्यासोबत पुर्णगड सागरी म, संघटना गाव कमिटी चे सदस्य श्री. रमेश आडविरकर व श्री. रोहिदास डावखुरे उपस्थित होते. तसेच मा. मंत्रि महोदयासमवेत झालेल्या या चर्चेदरम्यान मच्छिमार नेते व आमदार सन्मा. रमेश पाटील, महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष - श्री लिओ कोलोसो,
कार्याध्यक्ष – श्री रामकृष्ण तांडेल, सरचिटणीस- श्री. किरण कोळी, श्री चेतन पाटील, आदी, मच्छिमार नेते उपस्थित होते,
सागरी मच्छिमार संघटनेच्या या निवेदनाची मंत्री महोदयांनी आवर्जुन दखल घेत याबाबत शासनाच्या माध्यमातुन सकारात्मक निर्णय घेतले जातील असे आश्वासक प्रतिपादन केले. शासनाने या मागण्यांचा विचार करुन सकारात्मक निर्णय घेतले तर भविष्यात मच्छिमारांसाठी हा मोठा दिलासा मिळणार आहे. दखल न्यूज महाराष्ट्र
