बातम्या

माणगाव तालुक्यात २०८ उमेदवारांचे भवितव्य EVM मध्ये बंद..उत्कंठा २० डिसेंबर च्या निकालाची.

राम भोस्तेकर माणगाव

महाराष्ट्र राज्यात अनेक राजकीय स्थित्यंतरे घडल्यानंतर ग्रामसभा ते लोकसभा जोडणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायतीच्या निवडणूकासाठी १८ डिसेंबर रोजी मतदान झाले. यामध्ये माणगाव तालुक्यातील १६ ग्रामपंचायतिकरिता मतदान प्रक्रिया घेण्यात आली तर ३ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या.यामध्ये जनतेतून थेट सरपंच पदाकरिता ४२ उमेदवार तर सद्स्य पदाकरिता १६६ उमेदवार रिंगणात आहेत.अश्या २०८ उमेदवारांचे भवितव्य मतदारांनी EVM मध्ये बंद केले आहे.आणि आता मात्र सर्व ग्रामीण मतदाराना २० डिसेंबर च्या निकालाची उत्कंठा लागली आहे.
      माणगाव तालुक्यातील मुदत संपल्यानंतरच्या ग्रामपंचायत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या १९ होती त्यापैकी ३ ग्रामपंचायती बिनविरोध देण्यात आल्या,तर १६  ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले यामध्ये प्रामुख्याने बहुतांशी गावामध्ये विविध विकास पॅनल आणि गाव विकास आघाडी आणि विरुद्ध पॅनल अश्या प्रकारे निवडणूकीची तालीम जमली होती.असे जरी असले तरी राज्यातील राजकिय समीकरणे बदलल्यानंतर ह्या निवडणूका माणगाव तालुक्यात बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) व पूर्वी सत्तेत अस्तिवात असलेली महाविकास आघाडी अशी चुरस पहावयास मिळाली आहे.
      या निवडणुकीत गोरेगाव विभागातील गोरेगाव ग्रामपंचायत मध्ये समर्थ पॅनल विरुद्ध महाविकास आघाडी,तर निजामपूर विभागातील विळे भागाड औद्योगिक क्षेत्रात असलेल्या भागाड ग्रामपंचायत मध्ये तर निजामपूर विभागातिल महत्वाची समजली जाणारी शिरवली ग्रामपंचायत यामध्ये बाळासाहेबांची शिवसेना(,शिंदे गट) व महाविकास आघाडी अशी दुहेरी लढत आहे.
    या निवडणुकीसाठी माणगाव तालुक्यात प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्याकडून कोणताही तालुक्यातील कुठल्याही मतदान केंद्रावर  अनुचित प्रकार घडू नये याकरिता चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.याकरिता एकूण ५२ मतदान केंद्रावर पोलीस कर्मचारी यांच्यासह एकूण  ३१२ प्रशासकीय कर्मचारी निवडणूक कार्यभागाकरिता तैनात करण्यात आले होते.
   माणगाव तालुक्यात होणाऱ्या निवडणूकिकरिता यामध्ये मतदारांचा उत्साह दुपारी १:३० वाजेपर्यंत कमालीचा उत्साह दिसून येत होता.यामध्ये स्त्री मतदार १४१०८ तर पुरुष १४३३४ मतदार म्हणजेच एकूण २८८४१ मतदार मतदान करण्याकरिता मतदार याद्यांमध्ये समाविष्टीत होते त्यापैकी दुपार सत्रापर्यंत तालुक्यातील एकूण ६१ % मतदारांनी म्हणजेच १७३६३ मतदारानी आपला मतदानाचा हक्क बजावून जनतेतील थेट सरपंच पदासह सदस्य पदाच्या उमेदवारांचे भवितव्य EVM मशीन मध्ये बंद केले आहे आहे.आणि शेवटपर्यंत देखील मतदानाची प्रक्रिया शांतता व सुव्यवसथेत सुरू होती

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!